तणावमुक्त राहून दहावी परीक्षेस सामोरे जा : युवा नेते उत्तम पाटील

 बोरगाव येथे "अरिहंत" तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


अजित कांबळे / बोरगाव

दहावी परीक्षा हे विद्यार्थी जीवनात महत्त्वाचा घटक आहे .हे ओळखून विद्यार्थी परीक्षेत जास्त गुण मिळविण्यासाठी धडपडत असतात .परीक्षा जवळ आली की विद्यार्थी गोंधळात राहून अभ्यासाबाबत तणाव वाढून घेतात .त्यामुळे परीक्षेचे नियोजन बिघडते .तरी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून अभ्यास करावे व आपले ध्येय निश्चित ठरवून पुढील करिअरच्या दृष्टीने कमी वेळेत जास्त अभ्यासाला महत्त्व द्यावे असे मत अरिहंत शाळेचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.

येथील अरिहंत सभागृहात अरिहंत परिवाराच्या सहयोगाने व जितो करियर बेळगाव यांच्या मार्गदर्शनाने नववी व दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी युवा नेते उत्तम पाटील होते .तर प्रमुख वक्ते म्हणून बालचंद बाली, डॉ.राधिका कुलकर्णी, लक्ष्मण आश्टगी,जितो चे चेअरमन पुष्पक हनुमन्नवर होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसते. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी पालकांनाही धडपडणे गरजेचे आहे. कारण आज ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च पदावर पोहोचत आहेत. त्यांची धडपड पाहून अरिहंत परिवाराकडून जितो करिअर अकॅडमी यांच्यावतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावे .दहावी परीक्षेत उच्च गुण मिळवून विज्ञान पदवी प्राप्त करावी हे सर्वांनी ठरविलेले असते . पण असे न करता विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित ठरवून शिक्षण तज्ञांचा सल्ला घ्यावे असे केल्यास आपण जीवनात नक्कीच यशस्वी होतो असे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले.

डॉ.राधिका कुलकर्णी यांनी, दहावी परीक्षेबाबत पालकांनी विद्यार्थ्यांवर दबाव टाकलेला असतात यामुळे विद्यार्थी गोंधळात सापडलेला असतो. पण विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोंधळात पडू नयेत .मोबाईल पासून दूर राहून दररोज चार तास अभ्यासाला वेळ द्यावे. व वेगवेगळे विषय निवडावे. दहावी अभ्यासाला महत्त्व देऊन वारंवार उजळणी करावी, अभ्यासाचे नियोजन करून वेळापत्रक बनवावे. अभ्यास करीत असताना आपल्या आरोग्याकडे ही लक्ष देऊन तणावमुक्त राहून अभ्यास करण्याबाबत सल्ला दिला.

बालचंद्र बाली व लक्ष्मण आश्टगी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दहावी नंतरचा करियर या बाबत मार्गदर्शन केले.

जितो संस्थेचे चेअरमन पुष्पक हनुमन्नवर यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे यासाठी सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. सहकार बरोबरच शिक्षण क्षेत्राला अधिक महत्त्व देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी अरिहंत परिवाराची धडपड ही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

बोरगाव ,बोरगाववाडी ,मानकापूर, चांदशिरदवाड व परिसरातील सुमारे 500 हून अधिक विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास अरिहंत चे संचालक अभयकुमार करोले, जीतो अकॅडमी चे राहूल हजारे ,प्रवीण खेमलापुरे, अरिहंत प्रधान्य व्यवस्थापक अशोक बंकापुरे, सहायक व्यवस्थापक शांतिनाथ तेरदाळे ,अण्णासाहेब भोजकर ,बाळासाहेब हावले ,शमिका शहा, एस. ए. पाटील, ए. ए. धुळासावंत , एस.बी.परीट, सचिव अमित दोशी, दयानंद सदलगे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर वर्ग व अरिहंत परिवाराचे पदाधिकारी हजर होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष