शिरटी - शिरोळ मार्गावर पाणी : रात्रीपर्यंत वाहतूक बंद होण्याची शक्यता
शिरटी / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी राधानगरी व कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. आज ( रविवार ) सकाळी शिरटी - शिरोळ मार्गावर मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सध्या या पाण्यातूनच वाहतूक सुरू आहे. हे पाणी आणखी वाढल्यास महावीरनगर मार्गे कनवाड- शिरोळ रस्त्याने वाहतूक सुरू होईल. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांनी धीर धरला असला तरी धरणातील पाण्याचे विसर्गामुळे नागरिकांच्या मनामध्ये महापुराची धास्ती कायम आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा