शिरोळ तालुक्यात मिरचीवर थ्रीप्स रोगांचा प्रादुर्भाव
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यांतील मिरची पिकावर थ्रीप्स रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.यामुळे मिरची उत्पादक शेतकर्यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. गतवर्षी मिरचीने चांगले उत्पन्न मिळवुन दिले होते.म्हणुन यावर्षीही बहुतांशी शेतकर्यानी मिरचीचे पिक घेतले आहे. मात्र यावर्षी मिरचीवर नूरड्या,मुरड्या,लाला कोळी नावाच्या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव झाला आहे. या रोगामुळे मिरचीला तेज,चकाकी राहत नाही.यामुळे मिरचीचा दर्जा घसरला असुन बाजारपेठेत दरही कमी मिळत आहे.वातावरणातील बदलामुळे मिरचीवर विविध रोगांचा प्रार्दुभाव होत आहे.यामुळे पिकाची योग्य वाढ झालेली नाही. वाढ न झाल्यामुळे उत्पादन कमी मिळत आहे.
गतवर्षी उन्हाळी मिरचीच्या पिकाचे चांगले उत्पादन निघाले होते.दरही चांगला मिळाला होता.यामुळे यावर्षीही बहुतांशी शेतकरी मिरची पिकाकडे वळला.तर काहीनी आतंरपिक म्हणुन ही मिरची पीक घेतले आहे. मिरची ही एक महत्वाचे मसाले पिक असुन भारतीय आहारात तिचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.यामुळे मिरचीला वर्षभर मागणी असते. मिरचीचे पीक कोणत्याही हंगामात (उन्हाळा,पावसाळा,हिवाळा) लावता येते.मिरचीला नियमित पाणी देणे आवश्यक असते.मात्र पिकात जास्त पाणी साचुन राहुन चालत नाही.
मिरचीवर अति उष्णतेचा व हवामानातील बदलाचा परिणाम होतो.एप्रिल महिन्यातील अति उष्णता व मे अखेर झालेला अतिपाऊस मिरचीला मारक ठरला आहे. अति उष्णतेमुळे मिरची रोपे जागेवरच करपुन गेली,तर अति पावसामुळे शिवारात पाणी साचुन राहील्याने विविध रोगांचा प्रार्दुभाव झाला.यामुळे मिरची उत्पादक शेतकर्यांचा उत्पादनखर्च ही निघाला नाही.
मिरचीचे पिक हे सर्वसाधारण चार महिन्याचे असते.यासाठी एकरी उत्पादन खर्च साधारणतः एक ते सव्वा लाख येतो.यातुन चार महिन्यात सुमारे ५ ते ६ लाखाचे उत्पन्न मिळते.मिरचीची ५० दिवसानतंर तोड सुरु होते,नियोजनानुसार खत व्यवस्थापन,औषध फवारणी,रोग प्रतिबंधक उपाययोजना केल्यास एकरी १५ टन उत्पादन मिळते. सध्या चांगल्या हिरव्या मिरचीला बाजारपेठेत प्रतिकिलो ७० ते ८५ रुपये दर मिळत आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे निकृष्ठ टोमँटोच्या रोपामुळे शेतकर्यांना लाखोंचा अर्थिक फटका बसला आहे.येथील शेतकर्यांना उत्पादन खर्च लाखात घालुन, उत्पन्न हजारातही मिळाले नाही. टोमँटोनतंर आता मिरची पिकावरील थ्रीप्स रोगांमुळे मिरची ऊत्पादक शेतकर्यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
आधुनिक तंत्रज्ञान ,शास्त्रीय पध्दतीने शेती करुनही सद्याच्या हवामानातील बदलाचा सर्वच पिकावर परिणाम दिसुन येत आहे.यामुळे शेतकर्यांना मोठ्या अर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी असा एकमेव वर्ग आहे,जो कितीही नुकसान झाले तरी त्याला ते सहन करुन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुन्हा पुन्हा लढावे लागते.नुकसान भरपाई म्हणुन शासनाकडुन मिळणारी दीडदमडी कधी मिळेल तेंव्हा मिळेल ,मात्र आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी रशेतकर्यांना सर्व संकटावर मात करुन पुन्हा धडपडावे लागतेच.याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो.
महावीर पोमाजे.
भाजीपाला उत्पादक शेतकरी, आलास,ता.शिरोळ.
शिवार न्युजसाठी अनिल जासुद

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा