धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 


अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

कोयना,राधानगरी धरणातील विसर्गाबरोबरच आज सोमवार दि.१८ आँगष्ट पासुन वारणा धरणातुनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे.विविध धरणातील विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

   जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.पावसामुळे धरण पाणी साठ्यात सतत वाढ होत आहे.यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासुन कोयना व राधानगरी धरणातुन विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

  कोयना धरणपाणलोटक्षेत्रात पावसाचे प्रमाण आणखी वाढल्याने सकाळी सुरु असलेल्या विसर्गामध्ये दुपारी ४ वाजता आणखी वाढ करण्यात आली आहे.

 सोमवारी सकाळी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचललेले होते.यातुन १२,१०० क्युसेक विसर्ग सुरु होता.दुपारी ४ वाजता यामध्ये धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावरुन तीन फुटापर्यंत उघडले आहेत.यातुन १९,२०० क्युसेक विसर्ग व धरण विद्युत पायथा गृहाच्या दोन्ही युनिटमधुन २१०० क्युसेक असा एकुण २१,३०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.


 राधानगरी धरणाचे एकुण सात स्वंयचलित दरवाजे उघडले असुन यातुन १०,००० क्युसेक व विद्युतगृहातुन १५०० क्युसेक असा एकुण ११,५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

     तर वारणा धरणपाणलोटक्षेत्रातही मुसळधार पाऊस होत असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सोमवारी १८ आँगष्ट रोजी वारणा धरणाच्या वक्र दरवाज्यातुन १०,००० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे.तर विद्युत गृहातुन १६३० क्युसेक विसर्ग सुरु असुन एकुण ११,६३० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

 धरणपाणलोटक्षेत्रात पाऊस वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातील विसर्गही वाढविण्यात येणार आहे. 

  सद्या कोयनेतुन एकुण २१,३०० क्युसेक ,राधानगरीतुन ११,५०० क्युसेक व आता वारणेतुन ११,६३० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

 विविध धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा- पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे.यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 आज सोमवारी सांयकाळी ४ वाजेपर्यंत राजापुर बंधार्‍याजवळ पाणी पातळी २६ फुट ४ इंच,तर नृसिंहवाडीजवळ पाणी पातळी ३६ फुट झाली आहे.

 धरणातील विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील विविध नद्यावरील १९ बंधारे पाण्याखाली होती. तर सांयकाळी ४ वाजता ४५ बंधारे पाण्याखाली गेली आहेत.

हवामान खात्याने पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.यामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते.

  दरम्यान शिरोळ तालुक्यातही आज दिवसभर सर्वत्र धुवाँधार पाऊस सुरु आहे.

  आज सोमवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात ९६.८७ टीएमसी,वारणा धरणात ३२.०४ टीएमसी,अलमट्टी धरणात ११६.७०० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष