पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अधिवेशनात देशपातळीवरील आंदोलनाची घोषणा केली जाणार : राजू शेट्टी

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  देशातील सर्व पिकांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी देशातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांच्या शेतक-यांची ६ ,७ व ८ ॲाक्टोंबर रोजी दिल्ली मध्ये तीन दिवसाचे अधिवेशन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. दिल्ली येथे अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक श्री. व्ही. एम. सिंग यांच्या निवासस्थानी देशातील प्रमुख शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली.     यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि देशातील शेतक-यांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी २०१७ पासून देशातील संघटना आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारकडून देशातील २३ पिकांना हमीभाव दिला जात आहे मात्र हमीभावाचा कायदा नसल्याने २३ पिकांना हमीभाव असूनही  हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून देशातील शेतक-याची लुबाडणूक केली जात आहे. यामुळे हमीभावाचा कायद्याच्या मागणीला काश्मीर पासून ते कन्याकुमारी व गुजरात पासून ते आसाम पर्यंतच्या सर्व शेतकरी संघटना एकत्रित झाल्या आहेत. केंद्र सरकारने  हमीभाव कायद्याच्या गोष्टीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून  ...

गोव्यात ११ तरुणांना मारहाण करणारे जेरबंद

इमेज
  निपाणी / निरंजन कांबळे  गोव्यात फिरायला गेलेल्या चंदगडच्या तरुणांना मारहाण आणि ब्लॅकमेल करून लुटणाऱ्या तिघा आरोपींना पकडण्यात अखेर म्हापसा पोलिसांना यश आले आहे. सचिन भारद्वाज, आशिष सिंग (दोघेही हरयाणा) व मुबारक मुल्ला (तामिळनाडू) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याचे समजते.  मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना पर्यटनाच्या नावाखाली ब्लॅकमेल आणि मारहाण करून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसापूर्वी घडला होता. तसेच या तरुणांचे नग्न व्हिडिओ करून ब्लॅकमेल केल्याने हे तरुण प्रचंड दडपणाखाली होते. त्यांनी अखेर चंदगड पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करून रविवारी (दि. २९ मे रोजी) म्हापसा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज तिघांना अटक केली. संबंधित हॉटेल आणि परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि चौकशीतून ही कारवाई केली आहे. या कारवाईत सचिन भारद्वाज, आशिष सिंग (दोघेही हरयाणा) व मुबारक मुल्ला (तामिळनाडू) यांना अटक केली आहे.

अर्जुनवाड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

इमेज
  राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मेंढपाळ बांधव यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.        या कार्यक्रमास गजानन करे, संतोष दुधाळे उपसरपंच अर्जुनवाड, अमर पुजारी यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, बाबासाहेब डोंगरे, देवदास दुधाळे,किसन उगारे, सावंता उगारे, अभिजित दुधाळे, तानाजी डोंगरे, सुखदेव डोंगरे, ओंकार डोंगरे,बबलू डोंगरे, निलेश उगारे, महेश उगारे,योगेश उगारे, शीतल दुधाळे धनगर समाजातील मेंढपाळ बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.बी.टी. एम ग्रुप अर्जुनवाड यांच्या वतीने सायंकाळी आकर्षक विद्युत रोषनाई सह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या निषेधार्थ कुरुंदवाड कडकडीत बंद

इमेज
प्रतिकात्मक   पुतळा दहन करुन सर्व पक्षीय कृती समिती आक्रमक  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क    कोरोनाने मृत झालेल्या आईचे अनुदान आणि त्या जागेवर वारसदार म्हणून बहिणीला नोकरी देण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी 10 लाखाची मागणी करत कर्मचारी व ठेकेदाराकरवी 8 लाख रुपये स्वीकारले. उर्वरित 2 लाख रुपये देण्यासाठी अपमानस्पद वागणूक दिल्याने वाघेला कुटुंबीयांनी सामुदायिक इच्छामरणाला परवानगी मागितली होती. या अन्यायाविरुद्ध सर्व पक्षीय बचाव कृती समितीतर्फे आज सोमवारी कुरुंदवाड बंद पुकारण्यात आले होते. व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवले होते. दरम्यान सपोनि बालाजी भांगे यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.    सकाळी पालिका चौकातुन मोर्चाला सुरवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा पालिका चौकात आल्यानंतर मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले. मुख्याधिकारी जाधव यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून बोब-ठोक करण्यात आले.      निषेध सभेत माजी नगराध्यक्ष डांगे म्हणाले, कुरुंदव...

मेंढी पळविणे स्पर्धेत महालिंगराया कागल ग्रुपची मेंढी प्रथम

इमेज
  कुरुंदवाड / प्रतिनिधी :  हेरवाड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेंढी पळवणे स्पर्धेत कागल येथील महालिंगराया ग्रुपच्या मेंढीने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील स्पर्धक सहभागी झाले होते. येथील होळकर ग्रुपच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक हलसिद्धनाथ शेंडूर गावच्या ग्रुपने पटकाविला, तृतीय डंग्यासिध्द आरे तर चतुर्थ क्रमांक जॉनी प्रेमी कुरुंदवाड ग्रुपने पटकाविला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी होळकर मंडळाचे सर्व सभासद, गावकरी व शर्यत शौकीन उपस्थित होते.

हेरवाडमध्ये होळकर जयंतिनिमित्त ५१ जणांचे रक्तदान

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९७ व्या जयंतीनिमित्त हेरवाड येथील होळकर युवा ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.  प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ५१ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी महालिंग पुजारी, शंकर बरगाले, ग्रामपंचायत सदस्य सीमा बरगाले, बंडू बरगाले, आशिष अकिवाटे, सुरज कोरुचे, संतोष पुजारी, प्रथमेश पुजारी, संजय पाटील, विनोद खडके, अमुकसिद्द अकिवाटे, अभि ढोणे, गोरखनाथ पुजारी, समर्थ अकिवाटे, शुभम ईटाज, सनी पुजारी, मुतापा पुजारी यांच्यासहहोळकर ग्रुप चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयसिंगपूर शहर मॉडेल सिटी बनवायचे ध्येय : माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेले जयसिंगपूर शहर सर्वांत सुंदर शहर आहे या शहराशी सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर आण्णा यांच्या नंतर आमच्या तिसऱ्या पिढीचे नाते कायम आहे त्यामुळे या शहरांमधील जनतेच्या व्यापाऱ्यांच्या उद्योजकांच्या समस्या आणि अडचणी आम्हाला माहित आहेत त्या सोडवण्यासाठी मागील वीस पंचवीस वर्षात आम्ही सर्वांना सोबत घेऊन जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधी जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी खेचून आणलेला आहे यापुढेही जयसिंगपूर शहर मॉडेल सिटी बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे उदगार जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष आणि राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षाचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी काढले. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोड परिसरात असलेल्या वसाहतींमधील जवळपास साडे सतरा लाख निधी मधून करण्यात येणाऱ्या अंडरग्राउंड पाईपलाईन गटारीचे उद्घाटन संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते, माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे, संभाजी मोरे, पिंटू खामकर र...

शहिद जवान प्रशांत जाधव यांच्या पत्नीने दिली विधवा प्रभेला मुठमाती

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  लडाखमध्ये 26 जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन 7 जवानांचा मृत्यू झाला. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील बसर्गे बुद्रुक येथील प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) त्यांच्या निधनाची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली.प्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, कोरोची या गावांनी विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेऊन राजर्षी शाहू महाराजांना अनोखी मानवंदना दिली. दरम्यान शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या बसर्गे गावामध्येही त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर विधवा प्रथा बंद करण्यात आली. गावाने एकमताने हा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा पुरोगामी पणा पुन्हा दिसून आला आहे. त्यामुळे प्रशांत जाधव यांच्या पत्नी पद्मा यांचं कुंकू कायम राहिले आहे.

शिरोळ येथे राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  शंभर वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या राजर्षी शाहू वाचनालयाने आदर्शवत अशी प्रगती साधली आहे, या वाचनालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निश्चितपणे उपयोगी ठरतील. शहरामध्ये नगरपरिषदेच्या फंडातून प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून यामुळे शहराची सुद्धा सुरक्षा वाढणार आहे, असे मत शिरोळचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांनी व्यक्त केले.            येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिर या ठिकाणी शुक्रवारी बसविण्यात आलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे उदघाटन शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले,यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा आण्णासाहेब माने -गावडे यांनी स्वागत केले, उपाध्यक्ष एम एस माने यांनी प्रास्ताविक केले.     यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, शिरोळ शहरामध्ये नगरपरिषदेच्या फंडातून प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, यामुळे शहराची सुद्धा सुरक्षा वाढणार आहे, वाचनालया...

हेरवाडमध्ये उद्या पशु रोगनिदान शिबिराचे आयोजन

इमेज
माजी स भापती सौ.मिनाज युनुसअल्ली जमादार यांची माहिती हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मिनाज युनुसअल्ली जमादार यांच्या पुढाकाराने आणि विशेष प्रयत्नातून हेरवाड गावामध्ये सोमवार दिनांक ३० रोजी राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ सांस्कृतिक सभागृह हेरवाड येथे सकाळी आठ वाजलेपासून पशुपालकांच्या पशुसाठी भव्य सर्वरोगनिदान शिबीर, व्यंधत्व निवारण शिबीर, जंत निर्मूलन शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा लाभ सर्व पशुपालकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात औषधोपचार आणि औषधे मोफत दिली जाणार आहेत. या शिबीरासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए.पठाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार आणि शिरोळ तालुक्यातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तरी हेरवाड गावातील जास्तीत जास्त पशुपालक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाज जमादार यांनी केले आहे.

धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी जनरेटा उभारणार : रामचंद्र डांगे

इमेज
  नृसिंहवाडी येथे धनगर समाजाचा मेळावा संपन्न कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन आजपर्यंत राजकीय पक्षांनी समाजाचा वापर केला आहे.समाजात दुफळी निर्माण करायची सत्तेची पोळी भाजायची गरज संपल्यावर समाजाला वाऱ्यावर सोडायच काम राजकर्त्यांनी केलं आहे.हे आम्ही एकसंघ नसल्याने त्यांना शक्य झालं समाजाच्या उत्कर्षासाठी समस्त धनगर समाजाला एकत्रित करून जनरेटा उभारणार असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केले.          नृसिहवाडी ता.शिरोळ येथील संजय सांस्कृतिक हॉल येथे आज शनिवारी सकाळी 11 वाजता शिरोळ तालुका धनगर समाजाच्या बोलविण्यात आलेल्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष डांगे बोलत होते.डॉ.दशरथ काळे,वसंत हजारे,बाबासाहेब सावगावे आदी प्रमुख उपस्थित होते.    यावेळी बोलताना हजारे म्हणाले धनगर समाजात शिक्षणाची जागृती होऊ लागली आहे.समाजत शिकून सुशिक्षित बेरोजगार निर्माण होऊ नयेत या दृष्टिकोणातून त्यांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी चळवळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे.यासाठी समाजबांधवांनी पेटून उठण्याची गरज आहे. ...

कॉलेज बसला ईर्टीगाची धडक ; विद्यार्थ्यांसह आठ जण जखमी

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  अब्दुललाट येथे बरगाले ऊस रोपवाटिकेजवळ थांबलेल्या कॉलेज बसला समोरुन येणाऱ्या ईर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याने बसमधील ४ विद्यार्थी व ईर्टीगामधील ४ प्रवासी असे आठ जण जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी ईर्टीगाचे चालक अनंतसिंग गणेशसिंग रजपूत याच्या विरोधात कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अब्दुललाट येथील बरगाले ऊस रोप वाटिकेजवळ कॉलेज बस थांबली असता समोरुन आलेल्या इर्टीगाने या बसला जोरदार धडक दिल्याने स्वप्नील तेली, छाया तेली, ओवी तेली, संकेत तेली तर दिव्या पाटील, काजल बिंदगे, श्रेया आवटी, अर्पिता देवमोरे हे आठजण जखमी झाले आहेत. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक नागरगोजे करीत आहेत.

हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील यांची 'दिलखुलास' कार्यक्रमात मुलाखत

इमेज
  शिवार न्यूज नेटवर्क : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात विधवा प्रथेचे उच्चाटन करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ)चे सरपंच सुरगोंडा पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर शुक्रवार 27 मे व शनिवार 28 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. सहायक संचालक संध्या गरवारे यांनी ही मुलाखत घेतली आहे. महाराष्ट्राने नेहमीच पुरोगामी विचारांचा स्वीकार केला आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर यांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राने अधुनिकतेचा स्वीकार करत आपल्यातील अनिष्ट प्रथांना विरोध केला. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने हाच पुरोगामी विचार पुढे नेत विधवा प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याला महाराष्ट्र शासनाने पाठिंबा दिला आहे. या निर्णयाबद्दलची सविस्तर माहिती हेरवाडेचे सरपंच श्री.पाटील यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे

मातृछाया जनसेवा फाऊंडेशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी रोहीत परीट

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क मातृछाया जनसेवा फाऊंडेशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी हेरवाडचे सुपूत्र रोहीत परीट यांची निवड करण्यात आली आहे. सदरची निवड मातृछाया जनसेवा फाऊंडेशने चे संस्थापक अध्यक्ष श्री जयेशभाऊ मगन आहिरे यांनी केले.   अनेक वर्षांपासून रोहित परीट हे सामाजिक, शैक्षनिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच ते आदर्श शिक्षक म्हणून राज्यस्तरीय जिल्हा, स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मातृछाया जनसेवा फाऊंडेशने चे संस्थापक अध्यक्ष जयेशभाऊ मगन आहिरे यांनी आज रोहीत परीट यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. आहे फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, विकासत्मक व देशसेवा कार्यात सदैव सक्रीय राहुन जात धर्म विरहीत सामाजिक कार्य करावे सुचना देण्यात आल्या आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिक्षण विभागातील आदर्श व्यक्तीमत्व : नंदकुमार सुतार सर

इमेज
               शैक्षणिक, सामाजिक-राजकीय, वृत्तपत्र अशा विविध क्षेत्रात कमी-जास्त संघर्ष वाट्याला येऊनही आपल्या कार्याचा ठसा उंचावणारे येथील एस.पी.हायस्कूलमधील तंत्र विभागाचे निदेशक, नंदकुमार गुंडाप्पा सुतार हे आपल्या 38 वर्षांच्या सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त...   श्री नंदकुमार सुतार यांचे मूळ गाव वाघुर्डे ता. पन्हाळा असून त्यांचे प्राथमिक शिक्षण वाघुर्डे येथे तर माध्यमिक शिक्षण कळे येथे झाले. घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची असल्याने इयत्ता दहावी नंतर पैशाअभावी त्यांचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय वडीलांनी घेतला मात्र 1981 ला थोरले बंधू  हिंदुराव सुतार व पुनाळ ता. पन्हाळा येथील त्यांची बहीण रत्‍नाबाई सुतार व भाऊजी नारायण शंकर सुतार यांनी त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करण्याची तयारी दर्शविल्याने त्यांनी आय.टी.आय कोल्हापूर येथे प्रवेश घेऊन दोन वर्षाचा पॅटर्न मेकर ट्रेड पूर्ण केला.    1 सप्टेंबर 1984 ला येथे त्यांची तासिका तत्त्वावर निदेशक म्हणून निवड झाली. मात्र आर्थिक संकट कमी झाले नव्हते त्यामुळे नोकरी करण्...

शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा हेरवाड गावाने पुढे नेला : चित्राताई वाघ

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क  कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. विधवा प्रथा बंद करून राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा हेरवाड गावाने पुढे नेण्याचे काम केले आहे. आपण सर्वांनी एवढ्यावरच न थांबता विधवा महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून केंद्राच्या वतीने विधवा महिलांच्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले. प्रारंभी स्वागत सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केले. हेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा प्रथा बंद केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच सुरगोडा पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  यावेळी त्या पुढे म्हणाल्या, फक्त ठराव करून परिपत्रके काढून चालणार नाही याचे विचार समाजात रुजविणे गरजेचे आहे. याचा प्रचार आणि प्रसार गावात झाला पाहिजे. तसेच या अनिष्ठ रुढी परंपरेतून बाहेर पडणे महत्वाचे ...

जांभळीतील बंड्या प्रेमी ग्रुपच्या बैलाने जिंकली चांदीची गदा

इमेज
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क : इचलकरंजी येथे झालेल्या बिनदाती हातात बैल धरून पळविणे स्पर्धेत जांभळी येथील बंड्या प्रेमी ग्रुपच्या बैलाने प्रथम क्रमांक पटकावून ३ फूट चांदीच्या गद्याचा मानकरी ठरला आहे.  इचलकरंजी येथे सुमित गोसावी यांच्यावाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या देशी गायी - बैलांची संख्या कमी होत आहे. देशी बैल टिकविण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी बैलांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून इचलकरंजी येथे बैल हातात धरून पळविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशासनाच्या सहकार्याने कर्नाटक शासनाशी समन्वय ठेवून महापुराला सामोरे जाऊ

इमेज
  शिरोळ तालुका मान्सून पूर्व आढावा बैठकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे प्रतिपादन जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : तज्ञांकडून वर्तविण्यात येत असलेला चालू वर्षाच्या पावसाचा अंदाज पाहता धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, आणि जुलै ऑगस्ट महिन्यात कमी कालावधी मध्ये जास्त मिलिमीटर पाऊस पडला तर महापुराचे संकट ओढवू शकते महापूर येऊ नये अशीच माझ्यासह सर्वांची भावना आहे, पण तो आलाच तर मात्र प्रशासनाच्या सहकार्याने सर्वांना सोबत घेऊन कर्नाटक सरकारशी समन्वय साधत महापूर कसा टाळता येईल याबाबतच्या संभाव्य उपाययोजना पूर्ण केल्या जातील, आणि संभाव्य महापूरला सर्वांनी धैर्याने सामोरे जाऊ असे उदगार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले शिरोळ तालुका प्रशासनाच्या वतीने मान्सून पूर्व आढावा बैठक जयसिंगपूर येथील सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात सोमवारी संपन्न झाली यावेळी ते बोलत होते, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ प्रमुख उपस्थित होते,२०१९ ला महाविकास आघ...

हेरवाड पॅटर्न: मंगळूर गावाने घेतला विधवा प्रथा बंदचा निर्णय

इमेज
  सांगली/ शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड गावाने विधवा महिलांचा प्रश्न उचलून धरून त्याचा ठराव करून विधवा प्रथेला मुठमाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्य शासनाला याची दखल घ्यावी लागली, आता हेरवाड पाठोपाठ  सांगली जिल्ह्यातील मंगरूळ (ता. खानापूर विटा.) या गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या परिसरात गावाचे कौतुक केलं जात आहे. ग्रामीण भागात विधवा महिलांना सन्मान मिळाला, पती मृत झाल्यानंतर त्यांची आभुषणे न काढता आहे तशीच ठेवावी आणि प्रत्येक शुभकार्यात या महिलांना मान मिळावा, या हेतूने सांगली जिल्ह्यातील मंगरूळ (ता. खानापूर विटा.) या गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी माजी सभापती मा. आनंदराव काका पाटील, सरपंच अंजली कुंभार, उपसरपंच अभिजीत पाटील, ग्रामसेवक डी. एस. मोहीते, सुभाष नाना शिंदे, गुंडाराम जाधव, तानाजी थोरात, आण्णा शिंदे, नवनाथ बापू शिंदे, बाबुराव शिंदे, शिपाई जालिंदर वाघमारे व सर्व जेष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते.

विधवा महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कायम कटीबध्द

इमेज
आमदार जयश्रीताई जाधव यांचे हेरवाड येथे प्रतिपादन हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : विधवा महिलेचं दुख मी जाणते, हेरवाड गावाने विधवा महिला प्रथा बंद करुन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य शासनानेही या निर्णयाची दखल घेवून परिपत्रक काढल्याने आता राज्यातील विधवा महिलांना सन्मानाने जगता येणार आहे. विधवा महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कायम कटीबध्द असेन, असे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्रीताई जाधव यांनी केले. हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करुन याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याबद्दल आयोजीत सत्कार समारंभ कार्यक्रमात कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्रीताई जाधव बोलत होत्या. यावेळी इनरव्हील क्लबच्या वतीने आमदार जयश्रीताई जाधव यांच्या हस्ते गावातील विधवा महिलांचा शिल्ड देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील म्हणाल्या, हेरवाड गावाने विधवा महिला प्रथा बंद करुन महिलांचा सन्मान केला आहे. राज्य शासनानेही याची दखल घेवून परिपत्रक काढल्याने आता राज्यातील विधवा महिलांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे हेरवाडने केलेले कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहण्याजोगे असल्याचे सा...

दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन जयसिंगपूरातील सहा जण ठार

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन एकाच कुटुंबातील सहाजण ठार; तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना रविवारी मोहोळ तालुक्यातील पंढरपूर पालखी मार्गावर घडली. अपघातग्रस्त मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचे रहिवासी आहेत. इरफान नुरखाँ खान (40), बेनझीर इरफान खान (37), मुजाहिद इमाम आतार (37), डॉ. आफरीन मुजाहिद आतार (30), इनाया इरफान खान (2), अराफत मुजाहिद आतार (10, सर्व रा. मोहोळ, मूळ जयसिंगपूर) अशी मृतांची नावे आहेत. अरहान इरफान खान (10, रा. मोहोळ), अनिल सुभाष हुंडेकरी (35), मनीषा मोहन हुंडेकरी (30, दोघे रा. गादेगाव, ता. पंढरपूर) अशी जखमींची नावे आहेत. खान (आतार) हे कुटुंब वैद्यकीय क्षेत्रात कामानिमित्त सात वर्षांपूर्वी जयसिंगपुरातून मोहोळ तालुक्यात स्थायिक झाले होते. दरम्यान, या अपघाताची घटना समजताच जयसिंगपूर परिसरात शोककळा पसरली आहे. शाहूनगर भागातील चांदतारा मजिदजवळ यांचे कुटुंब व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मोहोळ येथील खान-आतार कुटुंबीय उन्हाळी सुट्टीसाठी रत्नागिरी येथे गेले होते. रविवारी ते मोटारीरने (एमएच 13 डीटी 8701) मोहोळकडे परतत होते....

हेरवाडला १५ लाखाचा निधी : नामदार डॉ.विश्वजित कदम

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी 15 लाखांचा निधी देणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी कोल्हापूर येथे केली. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व दि.18 एप्रिल ते 22 मे 2022 दरम्यान आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा समारोप केशवराव भोसले नाट्यगृहात झाला. यावेळी विधवा प्रथा बंदचा ठराव करून त्यांची अंमल बजावणी केल्याबद्दल सरपंच सुरगोंडा पाटील व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य...

बाजार समितींच्या बळकटीकरणासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार

इमेज
  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे प्रतिपादन जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : धावते जग व बदलत्या जीवनशैलीमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे महत्व दिवसेंदिवस कमी होत असले तरी या बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे उदगार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व डॉक्टर अंकल यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मार्केट यार्ड मध्ये आयोजित केलेल्या जयसिंगपूर कृषी महोत्सवाच्या उदघाटना प्रसंगी राज्यमंत्री यड्रावकर बोलत होते, शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि याच माध्यमातून शेतकरीसुद्धा उद्योजक व्हावा या भूमिकेतून कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाली त्या त्या काळातील परिस्थिती नुसार या बाजारपेठांचे वैभव अनेक वर्षे अबाधित होते पण बदलत्या परिस्थितीमध्ये व्यापारामध्ये निर्माण झालेली स्पर्धा आणि वेगाने पुढे निघालेले सर्व घटक यामुळे कृषी उत...

हेरवाडच्या स्मशान भुमिची डागडुजी करा : बंडू पाटील

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : महापुरात हेरवाड येथील स्मशानभूमीचे पत्रे महापुरात वाहून गेले आहेत. त्यामुळे गावातील मृतदेह दहन करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याकडे तातडीने लक्ष देऊन स्मशानभूमीची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी केली आहे.  महापुरात हेरवाड नदीकाठावर असलेल्या स्मशानभूमीचे पत्रे वाहून गेले. गेल्या वर्षभरापासून या स्मशानभूमीवर पत्रे नसल्याने पावसाळ्याच्या काळात मृतदेहांचे दहन करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. गुरुवारी गावातील एक व्यक्ती मयत झाली, दिवसभर मोठा पाऊस सुरू होता, त्यामुळे मृतदेह दहन करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर लगत असलेल्या निवारा शेडमध्ये सदरच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले. त्यामुळे सदर स्मशानभूमीची डागडुजी तातडीने करावी, अशी मागणी बंडू पाटील यांनी केली आहे.

श्री अर्जुनेश्वर क्षारपड सेवा संस्थेकडून गणपतरावं पाटील यांचा सत्कार

इमेज
  राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क : अर्जुनवाड ( ता. शिरोळ) येथील श्री अर्जुनेश्वर क्षारपड सेवा संस्था अर्जुनवाड यांच्या कडून शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिन सुधारणा करण्यासाठी उपयुक्त योगदान आणि अर्जुनवाड साठी विशेष प्रयत्नातून शासनाकडून हेक्टरी 60 हजार रुपये, पहिला हप्ता 51 लाख रुपये अनुदान मंजूर केल्याबद्दल  गणपतरावदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.      यावेळी श्री अर्जुनेश्वर क्षारपड सेवा संस्थेचे चेरमन विलास ईश्वर पाटील, व्हाईस चेअरमन सुरेश विद्याधर चौगुले, हनुमान सेवा सोसायटीचे चेरमन प्रदीप चौगुले, नंदकुमार पाटील, चंद्रकांत गंगधर, विजय सूर्यवंशी, किरण महाडिक, प्रमोद पाटील आदी सर्व संस्थेचे संचालक मंडळ, शेतकरी वर्ग उपस्थित होते.

हेरवाड-घोसरवाड मार्ग पाण्याखाली

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : गुरुवारी सायंकाळपासून सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोसल्याने हेरवाड - घोसरवाड हा मार्ग पाण्याखाली गेला. दरम्यान पावसामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.  हेरवाड येथे गुरुवारी सायंकाळपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. सुमारे १० ते १२ तास धो - धो पाऊस पडल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकरीवर्गाने कष्टाने पिकवलेल्या सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या पावसामुळे हेरवाड - घोसरवाड मार्गावर सुमारे तीन फुट पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

घोसरवाडच्या नाईकवाडे कुटुंबियांनी दिली विधवा प्रथेला मूठमाती

इमेज
  हेरवाड पाठोपाठ घोसरवाडचेही निर्णायक पाऊल घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करुन क्रांतिकारी मशाल पेटविली आणि याची अंमलबजावणी देखील केली. आता हेरवाड पाठोपाठ घोसरवाड येथील नाईकवाडे कुटुंबियांनी विधवा प्रथेला मूठमाती देऊन एक निर्णायक पाऊल उचलले आहे. घोसरवाड येथील धनगर समाजातील सिद्राम नाईकवाडे (वय : ३२) यांचे १८ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २२ वर्षाची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले आहेत. याची माहिती हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील यांना मिळताच त्यांनी गावातील पदाधिकार्‍यांसोबत नाईकवाडे यांच्या घरी जावून विधवा प्रथा बंदबाबत जागृती केली महिलांनाही सर्वांच्याबरोबर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्यांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडसे असा प्रकार अशोभनीय आहे. त्यामुळे नाईकवाडे कुटूंबियांनी ही प्रथा बंद करुन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. आणि याला नाईकवाडे परिवाराने होकार दर्शविला. हेरवाड पाठोपाठ घोसरवाड गावांनेही या प्रथेला मूठमाती देऊन क्रांतिकारी मशाल पेटवली आहे, त्यामुळे नाईकवाडे कुटुंबीयांचे या निर्णयाबद्दल सर्वत्र कौतुक होत...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघामार्फत हेरवाडचे सरपंच पाटील यांचा सत्कार

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :    पारंपरिक, जुनाट व अन्यायी विधवा परंपरेला कृतीतून छेद देणाऱ्या हेरवाड ता. शिरोळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सुरगोंडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय पुजारी,श्री.दिलीप शिरढोणे यांचा सत्कार प्राथमिक शिक्षक संघामार्फत टारे क्लब हाऊस, शिरोळ येथे जिल्हाध्यक्ष -श्री. रविकुमार पाटील यांचे शुभहस्ते व जिल्हा सरचिटणीस श्री.सुनिल पाटील,श्री. बाळासाहेब निंबाळकर, तालुकाध्यक्ष श्री.विजय भोसले,श्री.सुनिल येडके,श्री.विजयकुमार पाटील, श्री. प्रकाश खोत,श्री.परशराम कांबळे,श्री. मेहबूब मुजावर,श्री.शरद सुतार,श्री.भालचंद्र खोत,श्री. कुबेर गावडे,श्री. लक्ष्मण कबाडे,श्री.संतोष जुगळे यांचे बरोबरच विविध पतसंस्थांचे आजी, माजी चेअरमन, संचालक मंडळ, संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.

हेरवाडमधील चर्मकार समाजाचे निर्णायक पाऊल

इमेज
  विधवा प्रथा बंदची अंमलबजावणी करून पेटविली क्रांतिकारी मशाल  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाचे देशात स्वागत होत असतानाच येथील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या पुढाकारातून चर्मकार समाजाने विधवा प्रथा बंदच्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. पती मृत झाल्यावर कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे अशा कुप्रथा बंद करून निर्णायक पाऊल उचलल्यामुळे या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे.  हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला पण तो अंमलात आणणे ही एवढी सोपी गोष्ट नव्हती, मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच सुरगोंडा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व चर्मकार समाजातील पदाधिकारी यांनी याची अंमलबजावणी केली आहे.  हेरवाड येथील विष्णू गायकवाड वय (६० ) हे मयत झाले होते. मात्र या पदाधिकार्‍यांच्या पुढाकाराने थेट गायकवाड यांच्या घरी जावून विधवा प्रथा बंदबाबत जनजागृती केली महिलांनाही सर्वांच्याबरोबर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्यांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे असा प्रकार अशोभनीय आहे. त्यामुळे चर्मकार समाजाने ही प्रथा बंद करुन या मोहिम...

हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींला अनिसचा प्रेरणा पुरस्कार जाहीर

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  विधवांच्या अवहेलनेची प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने (अंनिस) 'सामाजिक प्रेरणा पुरस्कार' जाहीर केला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या दिवशी (ता.३१) हेरवाड व माणगाव येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे त्याचे स्वरूप आहे. सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ ठाणे येथील कमल विचारे यांनी दिलेल्या देणगीतून हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराची कल्पना सुचविणारे महात्मा फुले सामाजिक सेवा मंडळाचे प्रमोद झिंजाडे यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. अंनिसच्या अध्यक्षा सरोजमाई पाटील, डॉ. शैला दाभोलकर व अभिनेते किरण माने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जातील, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारी समितीच्या वतीने देण्यात आली. पुरस्कार सोहळ्यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन...

तेरवाड बंधार्‍यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धारेवर

इमेज
  स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक  तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : रसायनमुक्त व मैलामिश्रित पाण्यामुळे पंचगंगा नदी पात्रातील हजारो मासे मृत झाले आहेत. याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तेरवाड बंधाऱ्यावर पाण्याचे नमुने घेणे करिता दाखल झाले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उद्यापर्यंत कारवाई करू असे सांगितल्यानंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते शांत झाले.  गेल्या अनेक वर्षापासून पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न नदी काठावरील गावांना सतावत आहे. गेल्या दोन दिवसापासून नदीपात्रात प्रदूषणवाढल्यामुळे नदीपात्रातील हजारो मासे मृत झाली होती. याची दखल घेऊन आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तेरवाड बंधाऱ्यावर भेट देऊन प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उद्यापर्यंत संबंधित घटकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते शांत झाले.   यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे य...

नृसिंहवाडी येथे १९ रोजी मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : स्वर्गीय सौ. मालती शामराव पाटील मेमोरियल ट्रस्ट व भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट यांच्या वतीने कॅन्सर रुग्णांसाठी मोफत तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन गुरुवार दि. १९ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शिरोळ - नृसिंहवाडी रोडलगत असलेल्या संजय सांस्कृतिक हॉल येथे होणार असल्याची माहिती डॉ. संजयदादा पाटील आणि अँड. सुशांत पाटील यांनी दिली. या शिबिरात पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेदिक कॅन्सर तज्ञ डॉ. सदानंद सरदेशमुख व सहकारी तज्ञ डॉक्टर यांचे कडून कॅन्सर तपासणी, कॅन्सर रुग्णांना आयुर्वेदिक चिकित्सा सल्ला देण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ शिरोळ तालुक्यातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे. दरम्यान नांव नोंदणीसाठी डॉ. अभिषेक साळुंखे ( मो. 9768067094) कोल्हापूर केंद्र (99708484999), पुणे केंद्र (0230-67346000) या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेरवाडचा क्रांतिकारी निर्णय संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वी करू : चंद्रकांतदादा पाटील

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  विधवा प्रथा बंदचा ऐतिहासिक निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने गाव सभेत घेतल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हेरवाड हे पुरोगामी विचाराचे गाव निर्माण झालेला आहे. या गावातील महिलांनी पुढाकार घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल हेरवाड ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व महिला या सर्वांनी चंद्रकांतदादा पाटील यांची आज कोल्हापुरात भेट घेतली.  या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी ग्रामस्थांचे, महिलांचे तोंड भरून कौतुक केले. व अभिनंदन केले. त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते महिलांचा व ग्रामस्थांचा या निर्णयाबाबत सत्कार करण्यात आला. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे समन्वयक डॉ. संजयदादा पाटील ॲड. सुशांत संजय पाटील हेरवाड गावचे सरपंच सुरगोंड पाटील व इतर सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खासकरून यावेळी चर्चेमध्ये डॉ. संजयदादा पाटील यानी बोलताना सांगितले की, हा निर्णय रुजवण्यासाठी आपण सर्व मंडळी मिळून प्रयत्न करूया. यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, हा निर्णय महाराष्ट्राला नवी दिश...

.... अन्यथा उपोषण करणार : माजी सभापती मिनाज जमादार यांनी दिला इशारा

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड ग्रामपंचायतीच्या उदासिनतेमुळे माळभाग येथील सिध्दार्थनगर येथे रस्त्याचे काम रखडले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे या कामाकरीता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या फंडातून आणि माजी सभापती सौ.मिनाज जमादार यांच्या प्रयत्नातून सुमारे ५ लाख रूपये मंजूर झाले आहेत. याबाबत रितसर निविदाही मंजूर करण्यात आली आहे. निविदा प्रसिध्द होवून दोन महिने उलटले तरी कामाला अद्याप सुरूवात नाही. त्यामुळे लवकरात लवकर कामाला सुरूवात करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थासह माजी सभापती जमादार यांनी दिला आहे. सदर कामाची निविदा ही दि. २ मार्च रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. निविदा उघड्याची तारीख १० मार्च रोजी होणार्‍या मासिक सभेत होती. मात्र सदरच्या कामाची निविदा दोन महिने उलटूनही ग्रामपंचायतीने रस्ता कॉक्रीटकरण करण्याचे आदेश दिलेले नाहीत. ही निविदा प्रसिध्द केल्यानंतर जवळजवळ तीन आठवड्यांनी दिलेली समाजमंदिर बांधकामाची निविदा उघडून त्यांचा कार्यारंभ आदेशही देण्यात येवून सदर समाजमंदिरचे बांधकाम सुरू आहे. सदरच्या रस्ते कामाची लवकर सुरूवात व्हावी याकरीता येथील नागरिक...

देव आला द्यायला पदर नाही घ्यायला ?

इमेज
राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क : स्वातंत्र्य सेनानी व पुरोगामी गाव म्हणून समजल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड चा उल्लेख केला जातो. येथील एका पुरोगामी विचाराच्या महिलेने एक प्रस्ताव ग्रामपंचायत अर्जुनवाड मध्ये आणला पण त्याचे गांभीर्य न आल्याने लाखो रुपयांची मदत हेरवाड गावाला मिळाली त्यामुळे देव द्यायला आला पण पदर नाही घ्यायला अशी अवस्था अर्जुनवाड करांची झाली असल्याची चर्चा सध्या गावात सुरु आहे.    अर्जुनवाड येथील अंजली पैलवान या विधवा महिलेने ग्रामपंचायती कडे विधवा महिला यांच्या अन्यायला वाचा फोडणारे निवेदन दिले. त्याकडे ग्रामपंचायतीने पाठ फिरविली पण सदर निवेदनाची प्रत सरपंच ग्रुप च्या माध्यमातून हेरवाड गावच्या सरपंच यांना मिळाली त्यांनी त्याला क्षणाचा ही विलंब न करता अंमलबजावणी केली व सदर गावावर लाखो रुपयांचा निधी चा अक्षरशः वर्षाव खासदार सुप्रिया सुळे, मंत्री हसन मुश्रीफ, नीलम गोऱ्हे, मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदींनी हेरवाड गावाचा गौरव केला. त्यानंतर माणगाव या ग्रामपंचायतीने शाहू महाराज स्मुर्तीशताब्दी चे औचित्य साधत हेरवाड ग्रामपंचायतीचे त्यांनी ही अनुकरण क...

अर्जुनवाड येथे धर्मवीर छ. संभाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी

इमेज
  राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :     पराक्रमी, शूर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.  छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन इतिहासात कधीही पराभव न झालेला योद्धा, शूर, पराक्रमी, स्वराज्यरक्षक, कवी आणि निधड्या छातीचा योद्धा अशी केली जाते.     या वेळी माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वेळी हनुमान सेवा सोसायटी चे चेरमन प्रदीप चौगुले सावकर, नंदकुमार पाटील , संभाजी कळणंत्रे, विशाल सूर्यवंशी, प्रवीण गायकवाड,आकाश खोत, संदेश महाडिक, प्रणित वाणी विकास हंबीरव पाटील मास्तर, अनुप पाटील, सागर पाटील, ग्रामपंचायत चे सरपंच स्वाती कोळी उपसरपंच संतोष दुधाळे सहित ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविणार : नामदार हसन मुश्रीफ

इमेज
  हेरवाडच्या पदाधिकाऱ्यांचा नामदार हसन मुश्रीफ, यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाची राज्यातील मंत्रिमंडळाकडून दखल घेतली जात आहे. आज गुरुवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर व खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा मुंबई येथे सत्कार केला. तसेच हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी ३१ मे रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीला परिपत्रक काढून हा कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. त्यामुळे हेरवाड गावाने सुरु केलेल्या अभियानाला यश मिळत आहे. ४ मे रोजी झालेल्या गाव सभेत हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदचा ऐतिहासिक ठराव केला, आणि या ऐतिहासिक निर्णयाची दखल थेट मंत्र्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे,...

स्वप्नपूर्तीसाठी जिद्द, परिश्रम, चिकाटी हवी : गोविंद गावडे

इमेज
  शिवार न्यूज नेटवर्क  आपल्या जीवनातील स्वप्नपूर्तीसाठी, यशासाठी जिद्द, परिश्रम, चिकाटी हवी. ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने मार्गक्रमण करावे. परिस्थिती कोणतीही असो, त्या परिस्थितीशी सामना करा, संघर्ष करा. कारण प्रामाणिक प्रयत्नातून यश निश्चित मिळते, असा विश्वास कला व संस्कृती, क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी खांडोळा महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सवप्रसंगी व्यक्त केला. व्यासपीठावर मंत्री गोविंद गावडे यांच्यासोबत प्रा. पूर्णकला सामंत, प्रा. आशा गेहलोत, प्रा. सिताराम खठणकर, शिक्षण सचिव रवी धवन, सावन गावकर उपस्थित होते. कार्यक्रमांचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. श्री. गावडे पुढे म्हणाले, आजचे जग हे स्पर्धेचे आहे. प्रचंड गतीने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीचे अवलोकन करून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार शिक्षण घेणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित झाले, की त्यादृष्टीने कार्य करणे, प्रयत्न शक्य आहे. प्रत्येकात नेतृत्वगुण असतात, ते ओळखून त्या त्या क्षेत्रात कार्य करा. शिक्षण घेताना, कार्य करताना संयम, समयसूचकता आवश्यक असून जबाबदारीने आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर यशाची एकेक पायरी गाठायला हवी, ...

युवकांनी जैन धर्म पुढे नेण्यासाठी एकत्र यावे : स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी

इमेज
  चिंचवाड येथे जैन युवा संमेलन उत्साहात राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क : सध्याच्या काळात जैन समाज विभागला जात आहे. समाज एकत्रित ठेवायचा असेल तर आजचा युवक एकत्र झाला पाहिजे. जैन समाजातील युवक जागरूक आहे फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे, तेच काम येत्या काळात जैन युवा संमेलनाच्या माध्यमातून करणार आहोत, असे विचार जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. चिंचवाड ता. शिरोळ येथे श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर चिंचवाड व जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जैन युवा संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. महास्वामीजी पुढे म्हणाले, जैन समाजाने पंथ वाद बाजूला ठेवून वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्यासारखे आदर्श काम करायचे आहे. त्या दिशेने बाबासाहेबांनी उचललेले पाऊल आपणाला पुढे घेऊन जायचं आहे यासाठी युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी मांडले. प्रारंभी स्वागत कार्तिक चौगुले यांनी केले. प्रास्ताविक सुनिल चौगूले यांनी तर सूत्रसंचालन अभय भिलवडे यांनी केले. संमेलनाचे उद्घाटन स्व...

हेरवाडच्या क्रांतिकारी निर्णयाची शरद पवारांनी घेतली दखल

इमेज
  शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते  ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार सातारा / शिवार न्यूज नेटवर्क :   हेरवाड ग्रामपंचायतीने गावसभेत विधवा प्रथेवर बंदी आणून राज्यात क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी घेऊन लोकनियुक्त सरपंच सुरगोंडा पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सातारा येथे सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे प्रमुख उपस्थित होते.  यावेळी बोलताना शरदचंद्र पवार म्हणाले, हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करून एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, अशा निर्णयाच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील व हा कायदा अंमलात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, समाजामध्ये परंपरागत विधवा महिलांसाठी असलेली प्रथा हेरवाडकरांनी मोडीत काढून राज्यातच नव्हे तर देशात आदर्श निर्माण केला आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचा ठराव करून आपल्या गावांमध्ये विधवा महिलांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फ...

टाकळीवाडी : पोलीस असल्याचे भासवून चार तोळे सोने लंपास

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :    टाकळीवाडी (ता.शिरोळ) येथे एका ज्येष्ठ महिलेला पोलीस असल्याचे भासवून दोन भामट्यांनी चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या असा 1लाख,60 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.हा प्रकार बाबगोंडा पाटील यांच्या दुकानासमोर घडली.श्रीमती विलासमती शांतीनाथ पाटील (वय 60,रा.टाकळीवाडी ता शिरोळ) असे लुबाडणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.          टाकळीवाडी येथील श्रीमती पाटील ह्या श्रीपाल गोरे यांच्या घरातून चटणीकांडपमध्ये चटणी तयार करून डब्यातुन घेवुन घरी पायी चालत जात असताना ग्रामपंचायत रस्त्यावर बाबगोंडा पाटील यांच्या दुकानासमोर 40 ते 45 वयाच्या अज्ञात दोन भामटयांनी मोपेडवरून येऊन श्रीमती पाटील यांना अडीच वाजता सुमारास अडवून टाकळीवाडी गावांत दंगा झाला आहे. कुठं चाललंय आम्ही पोलीस आहोत घरी जावा असे सांगत ह्या सोन्याच्या पाटल्या घालून फिरु नका हातातून काढा असे सांगून काढायला लावून कागदात बांधुन देतो द्या इकडे असे सांगुन हातातील सोन्याच्या पाटल्या हातचलाकीने काढून घेऊन.चटणीचे डब्यात ठेवतो असे सांगुन नकली पाटल्यांची कागदी पुडी डब्यात ठेवून भ...

विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचगयतीने उचलले पाऊल

इमेज
  हेरवाडच्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव संमत संतोष तारळे / शिवार न्यूज नेटवर्क:  महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अनिष्ट प्रथेवर म्हणजे पतीच्या निधनानंतर विधवा समजून तिची आभूषणे काढणे, कुंकू पुसणे यांसह अन्य प्रकारे छळ करण्याची प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून याबाबतचा ठराव हेरवाडच्या ग्रामसभेत संमत करण्यात आला आहे. विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलेले पाऊल हे खरोखर कौतुकास्पद आहे. खरंतर विधवा महिलांच्या प्रश्नावर पूर्वी पासून अनेकांनी खूपच चांगले काम केले आहे. शाहू, फुले , आंबेडकर यांच्या कामाला तोडच नाही. डॉ नरेंद दाभोलकर व त्यांच्या टीममुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला. विधवा महिलांच्या पुणरविवाह, आरोग्य, आर्थिक, मुलांचे शिक्षण, अलीकडे कोरोना मुळे झालेल्या विधवा महिला यांचा प्रश्न दुर्लक्षीत राहिला आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरचा कुंकू यांसह, मंगळसूत्र तोडणे. बांगड्या फोडणे , पायातील जोडवी काढणे व काही ठिकाणी हे साहित्य पतीच्या अग्नीत टाकणे हा प्रकार तिच्या इच्छा विरोधी आहे. तसेच मरे...