पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

योग्य संस्कार हेच समाजनिर्मितीचे भांडवल : नितिन बानुगडे पाटील

इमेज
  हेरवाड येथे नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड (ता. शिरोळ) येथे एकता गणेशोत्सव मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रेरणादायी व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी ग्रामस्थ आणि युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, त्यागमूल्यांचे व आदर्श कार्याचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी वाणीमधून इतिहासातील प्रेरणादायी विचार, समाजघडविण्याचे संदेश व पालकांनी आपल्या पाल्यांना कसे घडवावे याची उदाहरणे देत उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे तरुण पिढीला शिवचरित्रातून जीवनमूल्ये स्वीकारून सकारात्मक बदल घडविण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या वकृत्वशैलीमुळे हे व्याख्यान गावाच्या सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत करणारे व युवकांना योग्य दिशा देणारे ठरले. या व्याख्यानासाठी रविवारी रात्री मोठ्या संख्येने ग्रामस्थ, मान्यवर व तरुण उपस्थित होते. व्याख्यानादरम्यान बानुगडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत समाजनिर्मितीचे धडे पटवून दिले. त...

बोरगाव सह परिसरात गौरीचे सोन पावलांनी उत्सहात आगमन

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : संपूर्ण देशात श्री गणेश चतुर्थी हा सण मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात येतो.गणेश मूर्ती प्रतिष्ठापना नंतर गौरी आगमन व स्थापना ला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. बोरगाव सह परिसरात रविवारी दुपारी गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळ पासूनच गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजून, डोल हलगी-ताशांच्या गजरात गौरींचे उत्साह पूर्वक स्वागत केले. घराघरात पूजा-अर्चा, फुलांची सजावट, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी वातावरण भारावून गेले. गौरी पूजनानिमित्त महिलांनी गाणी, झिम्मा फुगडी खेळत ओव्या म्हणत पूजा केली. खास करून लहान मुली व तरुणींनी या पारंपरिक सणात उत्साहाने सहभाग घेतला. *. महिलांनी गौरी सण सजावटीसाठी लागणारे साहित्य, फुले व पूजेच्या वस्तूंची खरेदी - जोरात झाली होती. घराघरात विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थांचे आयोजन करण्यात आले. यामुळे गावात ऐक्य व सौहार्दाची भावना दृढ होताना दिसली.  बोरगांव येथील काही मंडळांतर्फे सामूहिक गौरी पूजनाचे आयोजन करून महिला व बालिकांना एकत्र येऊन पारंपरिक ...

गणेशवाडीतील गणेशोत्सवाला स्वांतत्र्यपुर्व ऐतिहासिक वारसा

इमेज
  अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : गणेशवाडी (ता.शिरोळ) येथील गणेशोत्सवाला स्वांतत्र्यपुर्व,ऐतिहासिक वारसा लाभला आहे.  येथे सन १९२३ मध्ये स्थापन झालेल्या श्री सार्वजनिक गणेशोस्तव संस्थेला यावर्षी १०२ पुर्ण झाली आहेत.आजतागायत येथे पारंपारिक पध्दतीनेच गणेशोत्सव साजरा केला जातो.    सन १९१६ चा काळ.सारा देश स्वांतत्र्यांच्या चळवळीने पेटुन उठला होता. अशावेळी देव,देश अन धर्माची शिकवण देण्यासाठी गणेशवाडीत लोकसेवा संघ वाचनालय व व्यायामशाळा स्थापन झाली.  लोकमान्य टिळक कर्नाटक दौर्‍यावर असताना कर्नाटक सिंह गंगाधर देशपांडे यांच्या प्रयत्नाने त्यांना संघाने गणेशवाडीत आणले.सन १९१७ मध्ये येथे टिळकांची मोठी सभा झाली.  अदांजे तीन हजाराहुन अधिक लोक या सभेस उपस्थित होते.यावेळी गणेशवाडीकरांनी स्वांतत्र्य चळवळीस १५० रुपयाची देणगीही दिली.या भेटीत लोकमान्य टिळकांनी लोकसेवासंघास गणेशोत्सवाची प्रेरणा दिली.यावेळी संघाचे अध्यक्ष असलेले श्रीपाद मास्तर मराठे यांच्या पुढाकाराने वाचनालयाच्या कार्यालयात गणेशवाडीचा पहिला गणेशोत्सव साजरा झाला.तीन- चार वर्षे संघामध्ये गणेशोत्सव साजरा झाला...

शिरटीत पश्चिम गावठाण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज भव्य महाप्रसाद

इमेज
शिरटी / शिवार न्यूज नेटवर्क : शिरटी, तालुका शिरोळ येथील पश्चिम महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात. यावर्षीच्या गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त आज रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी जैन संस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी सात वाजता महिला- भगिनींसाठी ऑर्केस्ट्रा वैभव हा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, दत्त समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम, युवा नेते पृथ्वीराज यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे हे उपस्थिती राहणार असून लावणी सम्राट ज्योती यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन पश्चिम गावठाण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रवीण उदगावे उपाध्यक्ष प्रज्वल चौगुले खजिनदार प्रतीक पाटील आदिनाथ पाटील यांच्यास...

हरोली चांगल्या विचारांचे आदर्श गाव : जिल्हाधिकारी येडगे

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : हरोली हे चांगल्या विचारांचे आदर्श व उपक्रमशील गाव असल्याचे गौरवोद्‌‌गार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले हरोली (ता शिरोळ) येथील रौप्य महोत्सवी अजिंक्यतारा तरुण मंडळाने ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या अजिंक्यतारा अभ्यासिका केंद्राच्या उद्‌द्घाटनप्रसंगी व्यक्त केले. अजिंक्यतारा मंडळाने अद्यावत असे अभ्यासिका निर्माण केले आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी अभ्यासाकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या अभ्यासिका केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितपणे हे अभ्यासिका केंद्र मार्गदर्शक ठरेल. या केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी येडगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलताना पुढे म्हणाले, अजिंक्यतारा मंडळाने सुरु केलेला हा आदर्शवत उपक्रम असून असे उपक्रम संपूर्ण राज्यात राबवले जावेत.हरोली गाव नेहमीच सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिले असून जिल्हयात पहिला सोलर प्लॅंट उभा करण्या...

हेरवाड येथे उद्या नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड येथील एकता गणेशोत्सव मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान रविवार दि. ३१ रोजी रात्री आठ वाजता होणार आहे. या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यागमूल्ये व आदर्श कार्याचे सखोल मार्गदर्शन होणार असून ग्रामस्थांना इतिहासातून प्रेरणा घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, राजेंद्र माळी, ग्रामविकास अधिकारी महालिंग अकिवाटे, ग्रामविकास अधिकारी अप्पासो मुल्ला, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शेखर चौगुले, अक्षय कागले व विकास माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंडळाचे पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या व्याख्यानामध्ये ग्रामस्थांसह युवकांवर सुद्धा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरुण पिढीला शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी हे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे. नितीन...

शांतता, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांसह गणेशोत्सव साजरा करा: पोलीस निरीक्षक रविराज फडणीस

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :      कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांनी यावर्षीचा गणेशोत्सव डॉल्बी-मुक्त शांतता, पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जपून साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केले.      कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या सभागृहात कार्यक्षेत्रातील गावकामगार पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक फडणीस बोलत होते.       या बैठकीत पुढे बोलताना पोलीस निरीक्षक फडणीस म्हणाले मंडळांनी केवळ पारंपरिक उत्सव न साजरा करता विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा.यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या 'गणराया अवॉर्ड' या विशेष पुरस्कारासाठी मंडळांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्राधान्य दिले जाईल. यामध्ये रक्तदान शिबिर, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, बसवून सुरक्षितता वाढवणे, स्वतंत्र वीज कनेक्शन, अन्नदान आणि गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे अशा उपक्रमांना गुणांकन करताना महत्त्व दिले जाणार आह...

अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :      कुरुंदवाड येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अतिथी गृहात लोकनेते महामानव अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती व समस्त मातंग कुरुंदवाडतर्फे करण्यात आली आहे.     दरम्यान मागणीचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांना देण्यात आले आहे.    नमूद करण्यात आले आहे की, कुरुंदवाड येथे शिवतीर्थालगतच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अतिथिगृह आहे,या अतिथी गृहाच्या समोर प्रशस्त अशी बाग आहे त्या ठिकाणी कारंजा आहे, या बागेतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा आमच्या मागणीची पूर्तता लवकर पूर्ण करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा ही दिला आहे.      निवेदनावर शाहीर आवळे, बाबासो आवळे, रामदास आवळे, प्रशांत कांबळे, राजू आवळे, राजाराम भंडारे,सुरेश ठोंबरे,सागर आवळे, अमर आवळे, सुभाष आवळे, बाळू भंडारे आदींच्या सह्या आहेत.

कुरुंदवाड बाप्पामय : राजवाडा ते मशिदींपर्यंत दुमदुमला गणेशोत्सव.

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :        गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कुरुंदवाड शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलाल व फुलांच्या उधळणीने शहर दुमदुमले. पटवर्धन संस्थान सरकारचा ऐतिहासिक दीड दिवसाचा गणपती तसेच राजवाडा, गणेश मंदिर, पाच मशिदी व सार्वजनिक मंडळात विधीवत मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.       गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी महिलांसह पुरुष भक्तांची लक्षणीय गर्दी उसळली होती. राजवाड्यातील दोन शतकांहून अधिक काळ अखंडित सुरू असलेल्या या परंपरेत यंदाही पटवर्धन सरकार परिवाराने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. श्रीमंत भालचंद्रराव चिंतामणराव पटवर्धन सरकार, राणी सरकार, श्रीमंत राजकुमार रघुराजे भालचंद्रराव पटवर्धन व श्रीमंत राजकुमारी राजश्रीदेवी पटवर्धन यांच्या हस्ते गणेशपूजन पार पडले.       पालखी मिरवणुकीच्या वेळी कुंभार गल्ली, मारुती चौक, बाजारपेठ परिसर भक्तांच्या जयघोषांनी फुलून गेला. गर्दीचा मोठा ओघ पाहता पोलिसांनी शिवतीर्थ, सरकारी दवाखाना, दर्गा चौक व बाजारपेठेत...

घोसरवाड : धर्मवीर छत्रपती शंभूराजे मंडळाचा कायमस्वरूपी डॉल्बी मुक्त गणेशोत्सवाचा आदर्श निर्णय

इमेज
बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील घोसरवाडचा महाराजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या धर्मवीर छत्रपती शंभूराजे मंडळाने यावर्षीपासून कायमस्वरूपी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक, पारंपरिक तसेच सामाजिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प या मंडळाने केला असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. धर्मवीर छत्रपती शंभूराजे मंडळ गेली अनेक वर्षे अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करत आहे. आकर्षक स्टेज सजावट, विविध प्रकारची रोषणाई आणि धार्मिक कार्यक्रम यामुळे भाविकांची मने त्यांनी जिंकली आहेत. यावर्षी देखील मंडळाने धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे परिसरात आदर्श निर्माण झाला असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. “कुरुंदवाड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक  रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला,  असे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष शितल पुजारी यांनी सांगितले. या प्रसंगी मंडळाचे प्रमुख व तंटामुक्त समितीचे माजी अध्य...

भारतमाता विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीराला मोठा प्रतिसाद

इमेज
चिकुर्डे / शिवार न्यूज नेटवर्क : येथील भारत माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिकुर्डे येथे lराष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनाअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर यांच्यावतीने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. महेश बाबर यांनी विद्यार्थ्यांना शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध कडधान्ये, फळे, डाळी, भाजीपाला असा सर्वसमावेशक आहार घ्यावा असे आवाहन केले.  वैद्यकीय टीम मार्फत विद्यार्थ्यांची उंची, वजन, डोळे, कान, त्वचा यांची तपासणी करण्यात आली. तसेच आहार, स्वच्छता आणि लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टरांनी लहानसहान आरोग्य समस्या असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य सल्ला व उपचार दिले..  त्याचबरोबर तात्यासाहेब कोरे महाविद्यालय व संशोधन केंद्र नवे पारगाव यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत चिकित्सा शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांना दाताची काळजी घेण्याची आवाहन करून तपासणी करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. धनश्री पाटील,डॉ. माधुरी पायमल सर्व टीम तात्यासाहेब कोरे महाविद्यालयाच्या डॉ. समृद...

कृष्णेच्या पातळीत सहा फुटाने घट

इमेज
अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पातळीत सोमवारी २४ तासात सहा फुटाने घट झाली आहे. शिरोळ तालूक्यासह वारणा धरणपाणलोटक्षेत्रात पावसाने पुर्ण उघडीप दिली आहे.यामुळे रविवारपासुन वारणा धरणाच्या वक्र दरवाज्यातुन सुरु असलेला ३१९३ क्युसेक विसर्ग सोमवारी दुपारी अडीच वाजल्यापासुन बंद करण्यात आला आहे. मात्र धरणाच्या विद्युत गृहातुन १६३० क्युसेक विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे.तसेच राधानगरी धरण पायथा विद्युतगृहातुन १५०० क्युसेक सुरु आहे. शिरोळ तालुक्यातील पुर ओसरत असतानाच सोमवार दुपारपासुन कोयना धरणातुन विसर्ग वाढविण्यात आला आहे . कोयना धरणात पाण्याची आवक वाढत आहे.यामुळे सोमवारी दुपारी ४ वाजल्यापासुन धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फुटावरुन २ फुटावर नेण्यात आले आहेत.यातुन एकुण १८,९०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे.यामुळे सद्य पुरस्थितीत नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते.परिणामी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   शिरोळ तालुक्यात पुर ओसरत असला तरी अजुनही नद्यांचे पाणी पात्राबाहेरुनच वाहत आहे. शेत शिवारात शिरलेले पाणी हळुहळु कमी होत आहे....

आदर्श सोसायटी लि. सदलगा या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत संपन्न

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  चिकोडी तालुक्यातील अल्पावधीमध्ये जनसामान्यात नावारूपाला आलेली आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ओम मल्टीपर्पज हॉल येथे मोठ्या उत्साहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाहुबली कलाजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.   व्यासविठावरील मान्यवरच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले,  स्वागत व प्रास्ताविक भाषणात संस्थेचे संस्थापक बाहुबली कलाजे यांनी आपल्या संस्थेने या सात वर्षांमध्ये चार शाखांचा इतर खेड्यामध्ये विस्तार करून आपल्या आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटी मार्फत दुग्ध व्यवसाय, शेती व्यवसाय, वाहन खरेदी,शेड बांधकाम, हातमाग, कुक्कुटपालन, लघु विक्रेते अशा समाजातील सर्वसामान्य घटकांना आर्थिक मदतीचा हात देऊन समाजातील सामाजिक बांधिलकी जोपासून नवा आदर्श या आदर्श को-ऑपरेटिव्ह बँकेने केला असल्याचे त्यांनी सांगितले.  आपल्या बँकेमार्फत सभासदांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी पाच हजार रुपये त्याचबरोबर महिला सबलीकरणासाठी महिला बँकेची स्थापना अशा अनेक योजना आपण येत्या काळात राबवणार असल्याची त्य...

११०० झोपडपट्टीधारकांना येत्या वर्षभरात हक्काचे घर मिळवून देणार : आमदार यड्रावकर

इमेज
   राजीव गांधीनगर भागातील झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : राजर्षी शाहू महाराजांनी व्यापारी पेठ म्हणून जयसिंगपूर बसवल्यानंतर अनेक कुटुंबं रोजगारानिमित्त येथे स्थायिक झाली, पण त्यांना कायदेशीर घराचा हक्क मिळाला नाही. अनेक नेत्यांनी केवळ आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात समस्या सोडवली गेली नाही. जयसिंगपूर शहराच्या विकासात झोपडपट्टी धारकांचा मोठा वाटा आहे. गेल्या ५० वर्षापासून हक्काच्या घरासाठी प्रयत्न सुरू होते आज त्या प्रयत्नांना यश आले आहे. पहिल्या टप्प्यात ६४ जणांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत आहे यापुढेही या परिसरातील ११०० झोपडपट्टी धारकांना येत्या वर्षभरात हक्काचे घर मिळवून देणार आहे, अशी स्पष्ट ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.  जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर मधील ६१ झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.  प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात मुख्याधिकारी टीना गवळी यांनी नगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करून सर्व झोपडपट्टी धारकांना लवकरच प्रॉपर...

नशामुक्त युवक देशाचा खरी ताकद : पोलीस निरीक्षक एम.एस. शेख

इमेज
  निगवे खालसा येथे इस्पूर्ली पोलीस स्टेशन तर्फे नशा मुक्त अभियान व मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : समाजातील तरुणाई व काही नागरिक मोबाईलच्या रिल्स ,सोशल मीडिया आणि ड्रग्सच्या विळाख्यात सापडली आहे. व्यसनामुळे नागरिकांच्या आरोग्यच सोबतच त्याचे व संपूर्ण कुटूंब उध्वस्त होते. नशेचा परिणाम व्यक्तीच्या शैक्षणिक , सामाजिक व आर्थिक स्तरावर होऊन तो दिशाहीन होतो.त्यामुळे तरुणाईने व्यसनाच्या आहारी न जाता बलशाही भारत घडवण्यासाठी नशा मुक्त तरुण ही राष्ट्राची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन इस्पुर्ली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम. एस. शेख यांनी व्यक्त केले . निगवे खालसा(ता.करवीर ) येथे कोल्हापूर पोलीस दल व इस्पुर्ली पोलीस स्टेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या नशा मुक्त अभियान व मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार व करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री सुजितकुमार क्षीरसागर यांच्या सूचनानुसार सदरचा मॅरेथॉन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती कांबळे होत्या .  पु...

महापुराचा धोका टळला.. कृष्णा- पंचगंगेचा पुर ओसरु लागला

इमेज
   अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : गेले दोन तीन दिवस जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रात पावसाने दिलेली पुर्ण उघडीप,कोयना,वारणा धरणातुन पुर्णतः बंद करण्यात आलेला विसर्ग,राधानगरी धरणाचे सर्व स्वंयचलित बंद झालेले दरवाजे यामुळे कृष्णा- पंचगंगेची पाणी पातळी काल रात्रीपासुन ओसरु लागली आहे.परिणामी शिरोळ तालुक्यावरील महापुराचे संकट टळले आहे.  गेले दोन तीन दिवस पावसाने सर्वत्र उघडीप दिली आहे.यामुळे विविध धरणात पावसामुळे होणारी पाण्याची आवक बंद झाली आहे.परीणामी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारपासुन कोयना व वारणा धरणातुन करण्यात येणारा विसर्ग पुर्णतः बंद करण्यात आला.तर राधानगरी धरणाचेही सर्व स्वंयचलित दरवाजे बंद झाले आहेत.  याचाच परिपाक म्हणजे जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यातील कृष्णा - पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत शुक्रवारी रात्रीपासुन मोठ्या प्रमाणात घट होत गेली आहे.   तालुक्यात कृष्णा - पंचगंगेचा पुर ओसरु लागल्याने पुरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.    चार दिवसापुर्वी नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने हजारो पुरग्रस्तांना कुटुंबातील आबालवृद्ध सद...

हेरलेत कावीळ साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्क

इमेज
संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :  हातकणंगले तालुक्यातील हेरलेतील गावातील काही भागात कावीळ साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व ग्रामपंचायत यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली. आज हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार व साथ रोग नियंत्रण कक्ष कोल्हापूर येथील डॉ रेवडेकर व डॉ ताऊशी यांच्या आरोग्य पथकाने गावात भेट देऊन दूषित पाण्याच्या दगडी टाकीची पाहणी केली. तसेच या पाणी टाकीमधील पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राकडील 10 आरोग्य पथकांना संपूर्ण गावचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या व प्रत्यक्ष ज्या ठिकाणाहून पाणी दूषित होते त्या ठिकाणचे पाणी पिण्यासाठी सोडण्यात येऊ नये अशा सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 10 पथकानी आरोग्यसेवक, आशा कर्मचारी यांच्या मदतीने संपूर्ण गावामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू केले. यामध्ये गावातील 1963 कुटुंबांतील 9195 व्यक्तींचे सर्वेक्षण करून पाण्याचे नमुने, काविळीच्या संशयित रुग्णांचे व गरोदर मातांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले.या सर्वेक्षना...

हेरवाडच्या मुस्तकीम जमादारची जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तिहेरी सुवर्ण कामगिरी

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : येथील हेरवाड हायस्कूलचा विद्यार्थी कु. मुस्तकीम हसन जमादार याने नुकतीच इचलकरंजी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय शासकीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. १७ वर्षाखालील गटामध्ये त्याने १०० मीटर व २०० मीटर बटरफ्लाय प्रकारासह २०० मीटर मिडले या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या तिहेरी सुवर्ण कामगिरीमुळे त्याची निवड आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे. मुस्तकीमच्या या यशामुळे हेरवाड व परिसरात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवरून मिळालेल्या उत्तम मार्गदर्शनामुळे त्याने ही यशस्वी झेप घेतली. त्याला प्रशिक्षक श्री. संदीप पाटील सर यांचे कसून प्रशिक्षण, तसेच संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सेक्रेटरी अजित पाटील, वडील श्री. हसन जमादार, क्रीडा शिक्षक अजित दिवटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय मुख्याध्यापक श्री. प्रकाश मोहिते, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सतत प्रोत्साहन दिल्याने मुस्तकीमने आत्मविश्वासाने ही कामगिरी केली. त्याच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे त्याने जिल्हास्तरीय पातळीवर शाळेचे तसेच गावाचे नाव उ...

पाणी पातळीत मोठी घट होणार : कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद

इमेज
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : गेले दोन दिवस जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रात पावसाने पुर्ण विश्रांती घेतली आहे.यामुळे कोयना धरणसाठ्यात पाण्याची आवक अतिशय कमी झाली आहे.परिणामी आज शुक्रवारी रात्री आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटावरुन पुर्णपणे बंद करण्यात आले आहेत.यातुन सुरु असलेला १०,००० क्युसेक विसर्ग कमी होवुन मात्र धरणपायथा विद्युत गृहातुन २१०० क्युसेक एवढाच विसर्ग आता नदीपात्रात करण्यात येत आहे.   वारणा धरणातुनही विसर्ग पुर्णतः बंद असुन यातुन विद्युतगृहातील १६३० क्युसेक एवढाच विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.  कोयनेसह वारणा धरणातुन करण्यात येणारा विसर्ग पुर्णतः बंद झाल्याने शिरोळ तालुक्यातील गंभीर पुरपरिस्थिती उद्या शनिवार सकाळपासुन ओसरण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे.

पुरामुळे कुरुंदवाड आगार स्थलांतराच्या तयारीत ; ४६ बसेस शिरोळ येथे हलणार

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळे शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या महापुराच्या पाण्याचा फटका थेट कुरुंदवाड आगारालाही बसला असून आगार परिसरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आगार प्रशासनाने तातडीने स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. महापुराचे पाणी आगाराच्या हद्दीत शिरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. आगारातील बसेस, डेपोमधील साहित्य तसेच महत्वाच्या कागदपत्रांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. आगारप्रमुख नामदेव पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगारातील तब्बल ४६ बसेस शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात येणार आहेत. पूरस्थिती अनपेक्षित असल्याने बसेस सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक ठरले आहे. अन्यथा पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती. इतर महत्वाचे साहित्य बांधून ठेवण्यात आले असून कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूरामुळे कुरुंदवाड शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या सूचनांन...

रेकॉर्डवरील ७४ गुन्हेगारांना पोलिसांचा कडक इशारा

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शांतता आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहिम राबवली. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार जयसिंगपूर पोलीस उपविभागीय स्तरावर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शिरोळ पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग कॅम्प इचलकरंजी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले व वडगाव पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी झालेल्या या विशेष कॅम्पमध्ये शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे तसेच अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेले ७४ रेकॉर्डवरील आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी सर्व आरोपींना आगामी सणासुदीच्या काळात कायद्याचे पालन करण्यास व गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्या. तसेच जर यापुढे कोणत्याही आरोपीविरुद्ध ग...

शिरोळ तालुक्यात कृष्णा पातळीत ५ इंचाने घट

इमेज
  रात्रीत आणखी मोठी घट होण्याची शक्यता शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत थोडी घट झाल्याचे दिसून येत आहे. अर्जुनवाड येथे पाणी पातळी 53.3 फुटावर गेली होती ती शुक्रवारी सायंकाळी 52.10 फुटावर वर आले आहे. त्यामुळे शिरोळकरांचा जीव भांड्यात पडला असून अजूनही शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली असल्याने मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. कोयना व वारणा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीला पूर आला आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून पाऊस बंद झाला आहे तसेच वारणेतून व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटवण्यात आला आहे. यामुळे अर्जुनवाड ता. शिरोळ येथे ५ इंचाने पाणी पातळी घटल्याचे शुक्रवारी सायंकाळी दिसून आले. गुरुवारी कृष्णा नदीचे पाणी पातळीत वाढ होत होती. रात्री अर्जुनवाड येथे पाणी पातळी 53.3 फूट इतका झाला होता. शुक्रवारी सायंकाळी यामध्ये घट होऊन 52.10 फूट इतका झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्यात घट होईल अशी शक्यता आहे....

स्वप्नांना सावली देणारं झाड अखेर कोसळलं... !

इमेज
  सावलीसोबत असंख्य आठवणीही कोसळल्या हेरवाड येथील श्री काडसिद्धेश्वर मंदिराजवळ (सरकार मळा) येथे उभं असलेलं शेकडो वर्षांचं चिंचेचं झाड अखेर काळाच्या ओघात कोसळलं. हे झाड केवळ एक साधं झाड नव्हतं, तर गावाचा श्वास, गावाचं ओळखचिन्ह आणि असंख्य पिढ्यांचा सोबती होतं. गावाच्या इतिहासात या झाडाचं स्थान वेगळंच होतं. त्यामुळे या झाडाच्या कोसळण्याने गावकरी भावूक झाले आहेत. शेकडो वर्षांपासून उभं असलेलं हे झाड उन्हाळ्यात थंड सावलीचं छत्र होतं. गावातील शेतकरी, कामगार, खेळणारी मुलं, अभ्यास करणारे विद्यार्थी—सर्वांसाठी हे झाड आधार होतं. दुपारी गावकरी याच झाडाखाली विसावत, एकमेकांशी गप्पा मारत. पाखरांच्या किलबिलाटाने आणि वाऱ्याच्या सळसळाटाने झाडाचं अंगण जिवंत भासत असे. कितीतरी लहान मुलांनी या झाडावर झोके घेतले, तर कित्येक विद्यार्थ्यांनी त्याच्या सावलीत बसून पुस्तकं वाचली आणि यशस्वी आयुष्य घडवलं. हे झाड म्हणजे गावाच्या असंख्य यशकथांचा निःशब्द साक्षीदार होतं. अनेक विद्यार्थ्यांनी शाळा-कॉलेजच्या परीक्षांत आणि नंतर स्पर्धा परीक्षांत चमक दाखवली. त्या सर्वांच्या अभ्यासाचा साथीदार हे झाड होतं. म्हणूनच गावात क...

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची हेरवाड येथे पूरग्रस्त भागाची पाहणी

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी हेरवाड आणि आसपासच्या भागात पूरस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शुक्रवारी हेरवाड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. पाहणी दरम्यान आमदार पाटील यांनी प्रशासनाला आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः नदीकाठच्या भागातील नागरिकांचे स्थलांतर, सुरक्षित ठिकाणी निवासाची सोय, तसेच अन्न व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याबाबत दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले. पूरस्थितीशी संबंधित सर्व यंत्रणांनी सतत संपर्कात राहावे व नागरिकांना तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदारांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. पूर परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. गरज नसताना घराबाहेर पडू नये. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे आवाहन आमदार यड्रावकर यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी न...

दिलासादायक.... वारणेतुन विसर्ग बंद,कोयनेतुन मात्र १०,००० क्युसेक..राधानगरीतुनही २९२८ क्युसेक विसर्ग

इमेज
  अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क : गेले दोन - तीन दिवस पावसाने उसंत घेतली आहे.कोयना ,वारणा,राधानगरी धरणातुनही सुरु असलेला विसर्ग अतिशय कमी करण्यात आला आहे.परिणामी शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत रात्रीतुन मात्र सव्वा फुटाने वाढ झाली आहे.   आज सकाळपासुन चक्क ऊन पडले आहे.यातच पावसासह विविध धरणातील विसर्ग कमी झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीतही किंचीत वाढ झाली आहे.यामुळे शिरोळ तालुक्यात गुरुवारी दिवसभर स्थंलातर केलेल्या पुरग्रस्तांना खुपच मोठा दिलासा मिळाला आहे.    पुरामुळे तालुक्यातील अनेक स्त्यावर पाणी आल्याने गावां गावांचा संपर्क तुटला आहे.   कृष्णा- पंचगंगेचे पाणी शेत -शिवारात शिरल्याने नदीकाठावर,मळी भागात,शेतशिवारात वस्ती करुन असलेल्या अनेक गावातील शेतकरी,ग्रामस्थांना आपल्या कुटुंब व जनावरासह स्थंलातर करावे लागले आहे. स्थंलातर केलेल्या पुरग्रस्तांना या दोन दिवसात जो मानसिक त्रास सोसावा लागला,त्यांचे जे हाल झाले ते शब्दात व्यक्त करता येण्यासारखे नाहीत.कारण हा अनुभव खुपच वेदनादायी असतो.  मात्र आज सकाळपासुन तालुक्यात पावसाचा एक थेंबही पडला ना...

अकिवाट – मजरेवाडी मार्ग वाहतुकीसाठी बंद

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे नदी–नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रातून होत असलेल्या विसर्गामुळे पाण्याचा प्रवाह आणखी वाढून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. अकिवाट – मजरेवाडी या महत्त्वाच्या मार्गावर आज रात्री पाणी आल्याने तो मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस व प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सध्या या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोयना,वारणा,राधानगरीतुन विसर्ग झाला अतिशय कमी

इमेज
अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क : गेले दोन दिवस जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रात पावसाने उसंत घेतल्याने कोयना,वारणा,राधानगरी धरणातील मोठ्या प्रमाणात सुरु असलेला विसर्ग गुरुवारपासुन अतिशय कमी करण्यात आला आहे.   यामुळे शुक्रवारपासुन जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यातील विविध नद्यांच्या पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात होईल.परिणामी तालुक्यातील गंभीर होत असलेला पुराचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.    गेले दोन दिवस जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रातही पावसाने चांगलीच उसंत घेतली आहे. पाऊस कमी झाल्याने धरणसाठ्यात होणारी आवक कमी झाली आहे.परिणामी धरणातुन करण्यात येत असलेला मोठ्या प्रमाणातील विसर्ग गुरुवारी सकाळपासुन अतिशय कमी कमी करीत आणण्यात आला आहे.   गुरुवारी सकाळी ८ वाजता कोयना धरणातुन एकुण ८२,१०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु होता.यामध्ये दिवसभरात विसर्ग कमी करीत करीत तो रात्री नऊ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेचार फुटावरुन तीन फुटापर्यंत खाली आणण्यात आले आहेत.यातुन आता एकुण २१,९०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. तर वारणा धरणातुनही सकाळी आठ वाजता सुरु असलेला एकुण १५,३६९ क्युसेक विसर्ग द...

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीची आमदार यड्रावकर यांनी केली पाहणी

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : शहरातील पोलीस ठाण्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य नूतन इमारतीची पाहणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली. स्वतंत्र कक्ष, प्रतिक्षालय, बैठकीसाठी केलेली आधुनिक व्यवस्था तसेच नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा यांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी नूतन इमारतीची सविस्तर माहिती आमदार यड्रावकर यांना दिली. पोलीस दलाच्या कामकाजात वेग व पारदर्शकता यावी तसेच नागरिकांना उत्तम सेवा मिळावी, यासाठी या नव्या इमारतीतील सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे मत आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रमेश भूजुगडे, लक्ष्मण चौगुले, दादासाहेब पाटील, उदय डांगे, उमेश कर्णाळे, दीपक गायकवाड, दादेपाशा पटेल, शरद आलासे, अक्षय आलासे, सुरगोंडा पाटील, अर्जुन जाधव, अर्षद बागवान, रावसाहेब कुंभोजे, बाबासाहेब वनकोरे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. नवीन इमारतीमुळे पोलीस प्रशासनाला आवश्यक ती सुविधा मिळून कायदा व सुव्यवस्था राखण्यास...

दिलासादायक ...कोयना,वारणा,राधानगरीतुन विसर्ग झाला कमी

इमेज
  अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रात कालपासुन पावसाने काही अंशी उसंत घेतली आहे.यामुळे कोयना,वारणा,राधानगरीतुन होणारा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे.  विसर्ग कमी झाला असला तरी शिरोळ तालुक्यातील कृष्णा - पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढच होत आहे.   कृष्णेच्या पाणी पातळीत रात्रीतुन चार फुटाने वाढ झाली आहे.यामुळे तालुक्यातील बहुतांशी मार्गावर पाणी येत असल्याने अनेक गावांचा एकमेकाशी संपर्क तुटत आहे. तालुक्यात कृष्णेचे पाणी आता शेतशिवार ,ओढे,नाले पार करुन गावभागात शिरले आहे.यामुळे नदीकाठावरील रहीवाश्यांना स्थंलातर करावे लागत आहे. दरम्यान कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सकाळी ६ वाजता १३ फुटावरुन ११ फुटापर्यंत खाली आणण्यात आले आहेत.यामुळे यातुन सुरु असलेला एकुण ९५,३०० क्युसेक विसर्ग कमी करुन तो ८२,१०० क्युसेक करण्यात आला आहे.वारणा धरणातुनही आज सकाळी ७ वाजता सुरु असलेला एकुण २२,४६० विसर्ग कमी करुन तो एकुण १५,३६९ क्युसेक करण्यात आला आहे. तर राधानगरी धरणातुन ४३५६ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.  अलमट्टी धरणातुन एकुण अडीच लाखाने विसर्ग...

बावडा- शिये रस्त्यावर पुराचे पाणी ; रेल्वे परिक्षार्थीचे हाल

इमेज
  अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापुर जवळील शिये येथील टीसीएस आयआँन डिजीटल झोन केंद्रात आज गुरुवारी रेल्वे भर्ती बोर्डाच्या एनटीपीसी पुर्व स्नातक स्तरावरील संगणकावर आधारीत परिक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या परिक्षा तीन शिफ्टमध्ये आहेत. सकाळी साडेसात,सव्वा अकरा व दुपारी तीन वाजता अशा होणार आहेत.  यासाठी जिल्ह्यासह रत्नागिरी भागातील हजारो विद्यार्थ्यांना शिये येथील केंद्रावर यावे लागणार आहे. मात्र आज गुरुवारी सकाळी बावडा ते शिये मार्गावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा रस्ता बंद झाला आहे हे अनेक पालक,विद्यार्थ्याना माहीत झाले नाही.यामुळे कोल्हापुरहुन,रत्नागिरीहुन बावडा मार्गे शिये कडे येणार्‍या सर्वांचेच हाल झाले.जे चार चाकीने आले होते त्यांना परत तावडे हाॅटेल,हायवे वरुन जवळपास पंचवीस तीस किलोमिटरचा फेरा मारुन शिये केद्रांजवळ यावे लागले.तर जे दूचाकीने आले होते त्यांनी रस्त्यावरच आपली वाहने लावुन जवळपास पाच किलोमिटर रस्त्यावरील पाण्यातुन चालत आले. यामुळे बर्‍याच विद्यार्थ्याना परिक्षेसाठी वेळेत येण्यास विलंब झाला. धरणातुन सोडण्यात आलेल्या प...

कुरुंदवाड - बस्तवाड मार्ग पाण्याखाली; वाहतूक ठप्प

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसासोबत धरण क्षेत्रातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. या वाढत्या पाण्यामुळे आज सकाळी कुरुंदवाड शहराशी जोडणारा महत्त्वाचा कुरुंदवाड – बस्तवाड हा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तालुक्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच कुरुंदवाड – शिरढोण मार्गावरील पूलही पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे अनेक नागरिकांना आवश्यक कामांसाठी मोठा अडथळा निर्माण झाला असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याची वेळ आली आहे. सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. वाहतूक ठप्प झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांपर्यंत सर्वांनाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांना अनावश्यक...

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील 139 शाळा बंद

इमेज
      कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे भुदरगड  तालुक्यातील 9,  गगनबावडा 46, करवीर 5, पन्हाळा 34 राधानगरी 30 व शाहूवाडी तालुक्यातील 15 अशा एकूण 139 शाळा आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी बंद आहेत. याबाबत जिल्हा स्तरावरुन वारंवार आढावा घेतला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बंद असलेल्या शाळांची माहिती - आजरा- एकूण शाळा- 165, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0 भुदरगड- एकूण शाळा- 233, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 9, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 9 चंदगड - एकूण शाळा- 285, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0 गडहिंग्लज- एकूण शाळा- 165, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0 गगनबावडा - एकूण शाळा- 237, बंद असलेल्...

पुरामुळे शिरोळ तालुक्यात "हे" मार्ग बंद

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : गेल्या आठवड्यात घरापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील प्रमुख मार्ग व तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना केल्या असून नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.  या मार्गावरील वाहतूक बंद  हेरवाड - अब्दुललाट नांदणी - कुरुंदवाड  शिरढोण - नांदणी  शिरोळ - नांदणी  कुरुंदवाड - शिरोळ बंधारा तेरवाड बंधारा राजापूर बंधारा कनवाड - म्हैशाळ बंधारा  कोथळी - समडोळी बंधारा दत्तवाड - मलिकवाड बंधारा  दतवाड - एकसंबा बंधारा  घोसरवाड - सदलगा बंधारा

कोयनेचे दरवाजे १३ फुटापर्यंत उचलले.वारणेतुन विसर्ग वाढविला

इमेज
  अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : धरणपाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने कोयना व वारणा धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी रात्री आठ वाजता दोन्ही धरणातुन विसर्ग वाढविण्यात आला आहे.    कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे मंगळवारी रात्री आठ वाजता १२ फुटावरुन १३ फुटापर्यंत वर उचलले आहेत. यातुन ९३,२०० क्युसेक व धरण विद्युत पायथागृहातुन २१०० क्युसेक असा एकुण ९५,३०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे.    वारणा धरणपाणलोटक्षेत्रातही पाऊस वाढल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी रात्री आठ वाजता विसर्ग वाढविण्यात आला आहे.    वारणा धरणातुन सांयकाळी सुरु असलेल्या ३४,७३२ क्युसेक विसर्गामध्ये रात्री आठ वाजता वाढ करुन तो एकुण ४०,००० क्युसेक करण्यात आला आहे.   धरणपाणलोटक्षेत्रात पाऊस वाढल्यास विसर्गामध्ये आणखु वाढ करण्याचे संकेत धरण प्रशासनाने दिले आहेत.   धरणातुन करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील नंद्याच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे.यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. द...

जयसिंगपुरात डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भीमसृष्टी साकारणार : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या लौकिकास साजेसा असा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी भव्य भीमसृष्टी जयसिंगपूर शहरात लवकरच साकारत असून जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभे राहणारे डॉ.बाबासाहेबांचे हे भव्य स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिरोळ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे जयसिंगपूर शहरामध्ये उभारणार अशी ग्वाही मी शिरोळच्या जनतेला दिली होती. असे सांगताना यड्रावकर म्हणाले, सध्या उभारण्यात आलेल्या शिवतीर्थाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचे निश्चित केले होते, शिवतीर्थची जागा राज्य शासनाची होती आणि मी मंत्रिमंडळात सदस्...

धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

इमेज
  अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क : कोयना,राधानगरी धरणातील विसर्गाबरोबरच आज सोमवार दि.१८ आँगष्ट पासुन वारणा धरणातुनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे.विविध धरणातील विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.    जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.पावसामुळे धरण पाणी साठ्यात सतत वाढ होत आहे.यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासुन कोयना व राधानगरी धरणातुन विसर्ग सुरु करण्यात आला आहे.   कोयना धरणपाणलोटक्षेत्रात पावसाचे प्रमाण आणखी वाढल्याने सकाळी सुरु असलेल्या विसर्गामध्ये दुपारी ४ वाजता आणखी वाढ करण्यात आली आहे.  सोमवारी सकाळी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचललेले होते.यातुन १२,१०० क्युसेक विसर्ग सुरु होता.दुपारी ४ वाजता यामध्ये धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावरुन तीन फुटापर्यंत उघडले आहेत.यातुन १९,२०० क्युसेक विसर्ग व धरण विद्युत पायथा गृहाच्या दोन्ही युनिटमधुन २१०० क्युसेक असा एकुण २१,३०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आ...