पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतातील टॉप १०० इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शरद इन्स्टिट्युटचा समावेश

इमेज
यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :       यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा सिलिकॉन इंडिया या देशपातलीवरील अग्रेसर नियतकालिकेकडून टॉप १०० इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ इंडिया मध्ये समावेश झाला आहे.  अल्पावधीत स्वायतता, एनबीए, नॅक या मानांकनासह ‘शरद पॅटर्न’चे प्रभावी अंबलबजावणी, अद्यावत बहुविद्याशाखीय अभियांत्रिकी शाखा, अद्यावत टिचिंग-लर्निंग शिक्षण प्रणाली, विद्यार्थ्यांना अंतिम वर्षी प्रत्यक्ष कंपनीत इंटर्नशीप, कॅम्पस मधून विद्यार्थ्यांची निवड, प्रोजेक्ट बेसड लर्निंग, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, इनोव्हेशन अॅण्ड लर्निंग सेंटर्स, युजी फेलोशिप, देशातील अत्यंत बारकाईने राबवित असलेली मेंटॉर सिस्टिम अशा अनेक बाबींचे परिक्षण करुन हि यादी बनविण्यात आली आहे. सिलिन इंडिया हे नियतकालिक हे अभियांत्रिकी महाविद्यालयांची संपूर्ण व्याप्ती समजून घेऊन, ‘भारतातील टॉप १०० अभियांत्रिकी महाविद्यालये - २०२४’ ची तपशीलवार यादी तयार केली आहे. भारतातील अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील अग्रदूतांची ही यादी सिलिकॉनइंडिया संपादकीय मंडळ, अभियांत्रिकी तज्ञ, एचआर व्यवस्थापक, अलीकडील ...

संजय घोडावत कॉमर्स अकॅडमीचे सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश

इमेज
अतिग्रे / शिवार न्यूज नेटवर्क : संजय घोडावत कॉमर्स अकॅडमीच्या 17 विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. 400 गुणांच्या या परीक्षेत युग मारू या विद्यार्थ्याने 359,ओम येडवडे 324 आणि श्रेया मोडासे 290 गुणांसहित उत्तीर्ण झाले.       चार्टर्ड अकाउंटन्सी अभ्यासक्रमातील सीए फाउंडेशन परीक्षा जून 2024 मध्ये घेण्यात आली या परीक्षेचा निकाल सोमवार 29 जुलै रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आला. देशभरातून प्रविष्ट झालेल्या एकूण 91,900 विद्यार्थ्यांपैकी 13,748 विद्यार्थी.(14.96%) उत्तीर्ण झाले.        सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संचालक वासू सर , सेंटर हेड गुप्ता सर, प्रिन्सिपल सौ.चैताली गुगरी व झोनल हेड प्रभू सर यांचे मार्गदर्शन लाभले.           संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी,पालक, शिक्षक व कर्मचारी यांचे अभिनंदन करून यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पत्रकार महामंडळाच्या कार्याला गती ; व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे पाठपुरावा

इमेज
  मुंबई / शिवार न्यूज नेटवर्क : पत्रकारां साठी महामंडळाच्या निर्मितीसाठी वाईस ऑफ मीडियाने केलेल्या अनेक आंदोलन, उपोषण अशा प्रकारच्या लढ्याला यश आले असून पत्रकार महामंडळ निर्मितीच्या प्रक्रियेला शासन स्तरावर गती मिळालेली आहे.  पत्रकारांचे एकूणच कार्य पाहता, पत्रकारांचे हे महामंडळ कामगार विभागांतर गत निर्माण होणार असून यासंदर्भातल्या अटी शर्ती नियमावली तयार करण्यासाठी एक स्वतंत्र उपसमिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, या समितीत माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक उपसंचालक दर्जाचे अधिकारीही सदस्य म्हणून काम पाहतील.  व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप काळे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल मस्के मुख्य संयोजक तथा प्रदेश कार्याध्यक्ष श्री योगेंद्र दोरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि वारंवार मुख्यमंत्री महोदय, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आदींकडे प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन पत्रकारांच्या महामंडळांची गरज लक्षात आणून याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे.  लवकरात पत्रकारांच्या महामंडळाच स्वरूप कसे असावे याबाबत पत...

आता ते आधीचे माझे कुरुंदवाड राहीलेच नाही

इमेज
  कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) हे संस्थानकालीन गाव. जीवनदायिनी असलेल्या कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले एक टुमदार गाव. गावाच्या तिन्ही बाजूनी घेराव घालून वाहणाऱ्या नद्या. सर्व शेती कशी सुपीक नदीकाठची. कधी निसर्गाच्या टोकाच्या आपत्तीचा सामना करावा लागला नाही. कधीही गावाला गेल्यावर पंचगंगा नदीवरचा वाडी रस्त्यावरचा पूल ओलांडताना चोहोबाजूंनी हिरवीगार शेती बघून जे मनाला समाधान वाटत असे  त्याचे शब्दात वर्णन करता येणे केवळ अशक्यच.  सध्या मात्र ह्या नद्याच ज्यावर इतके दिवस माज केला जायचा, त्याच ह्या परिसराच्या अस्तित्वाच्या मूळावर उठल्या आहेत की काय अशी शंका प्रत्येक कुरुंदवाडवासीयाच्या मनात येत आहे.  कुरुंदवाडवासी पुराच्या नुसत्या कल्पनेने भेदरून गेला आहे. निसर्ग अशा विध्वंसाच्या टोकाला कधी आपल्याला नेईल असे स्वप्नात अथवा कल्पनेत पण कधी येथील लोकांना वाटले नव्हते. पण आज परिस्थिती पूर्णपणे १८० अंशात बदलली आहे तसेच निसर्गाने आपल्या वर्तनाचे एकदम विरुद्ध टोक गाठले आहे.   २००६, २००७ त्यानंतर २०१९ व काही प्रमाणात २०२१ अशा मोठ्या पुराच्या आठवणीनेच कुरुंदवाडकर घाबरून उठत...

प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावेत : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : सध्या धरण क्षेत्राबरोबर शिरोळ तालुक्यात पाऊस थांबला आहे. त्यामुळे पूर ओसरत चालला असून प्रशासनाने तातडीने पंचनाम्याची तयारी करावी, शेतकरी आणि जे पुरग्रस्त नागरिक आहेत त्यांच्या घराचे आणि शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात करावे, अशा सूचना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी बोलताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, पूरस्थितीत ज्या - ज्या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा प्रत्येक गावातील रस्त्यांची उंची वाढवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून त्याचा अहवाल तयार करावा. सध्या पावसाने उसंत घेतल्याने पाणी पातळीत घट होत आहे. शिरोळ तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सरकार हे पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी असून लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.  पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने अत...

श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्त जनावरांसाठी चाऱ्याचे वाटप

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :      श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पूरग्रस्त जनावरांसाठी चाऱ्याचे वाटप करण्यात आले. प्रति जनावरांसाठी तीन दिवसाकरिता सहा मोळीचे वाटप करून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.      श्री दत्त साखर कारखाना हा नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आला आहे. यावर्षी शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याने आणि धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने कित्येक कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. त्याच पद्धतीने आपल्या जनावरांनाही निवारा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी सोडावे लागले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने चांगला चारा उपलब्ध करून देण्याची भूमिका श्री दत्त साखर कारखान्याने घेतली आहे.        शेतकरी, सभासद आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्न करणाऱ्या कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपत तेरवाड येथील ताळ बिरोबा देवळाजवळ, गट नंबर 436 मधील श्रीपती महादेव चव्हाण यांच...

पुरपरिस्थितीत माणूसकीचे दर्शन

इमेज
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :  आपत्ती व्यवस्थापन व कुरुंदवाड नगरपरिषद अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या माणुसकीमुळे मजरेवाडी येथील एका रुग्णावर वेळेवर उपचार होऊन प्राण वाचले ही घटना रविवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान घडले.   याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मजरेवाडी तालुका शिरोळ येथील मनोज बंडगर या रघुनाथ अचानक अस्वस्थ वाटू लागले मजरेवाडी कुरुंदवाड दरम्यान ही काही प्रमाणात रस्त्यावर पाणी होते त्यांच्या नातेवाईकांनी कसेतरी कुरुंदवाड गाठून रुग्णावर उपचार होण्यासाठी धावाधाव केली मात्र रविवार असल्याने सर्व दवाखाने बंद होते व कोणत्याही डॉक्टरांशी संपर्क होऊ शकला नाही अखेर हाताश होऊन ते शिवतीर्थ कुरुंदवाड येथे आले येथे चेक पोस्टवर कुरुंदवाड नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन चालक करण आलासे अग्निशमन फायरमन हेमंत वायचळ यांनी अग्निशमन चे नितीन संकपाळ शरद गायकवाडहेमंत सावंत तुकाराम पवार असरार पटेल संतोष पाटील श्रीकांत बडोदे पाटील विजय पवार आदी च्या सहकार्याने रात्रीचा अंधार लाईट नाही त्यात शिवतीर्थावर तीन फूट तर दिनकर यादव फुलावर एक फूट पाणी अशा बिकट परिस्थितीत अग्निशमन ग...

नवभारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी दामोदर सुतार यांची फेरनिवड

इमेज
  शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :      सांगली येथील नवभारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी हेरवाड (ता. शिरोळ) येथील दामोदर सुतार गुरुजी यांची फेरनिवड करण्यात आली. खासदार विशाल दादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.        नवभारत शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शांतिनिकेतन लोक विद्यापीठातील स्वातंत्र्य सैनिक धोंडीराम माळी रेड कॉर्पेट सभागृहात झाली. यावेळी वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी विशाल दादा पाटील होते.         दामोदर सुतार यांनी अनेक सहकारी, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रदीर्घ काळापासून काम केले आहे. प्राथमिक शिक्षक बँकेचे 22 वर्षे माजी चेअरमन, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त भांडारचे विद्यमान चेअरमन तसेच विविध संस्थांमध्ये अनेक पदावर संचालक, मार्गदर्शक म्हणून सध्या काम पाहतात. नवभारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची फेरनिवड होऊन त्यांचा सत्कार यावेळी खासदार विशाल दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.      सभेचे प्र...

औरवाड उपसरपंचपदी अफसर पटेल यांची बिनविरोध निवड

इमेज
    अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :               शिरोळ तालुक्यातील औरवाड ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अफसर पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच शफी पटेल होते.       विशाल दुग्गे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोटेशन नुसार आज ग्रामपंचायत सभागृहात उपसरपंच निवड करण्यात आली. यावेळी अफसर पटेल यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन उपसरपंच अफसर पटेल यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून गावातील प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी उपसरपंच दादेपाशा पटेल, सईद पटेल, तन्वीर बहादूर,  यासीन बहादूर , विजय दुग्गे ,अण्णा कांबळे ,जाकीर पटेल,  मुस्ताक पटेल ,जमील पटेल  ,   जक्की पटेल ,एम जी पटेल , वंदना गावडे, नारायण गावडे ,दिलीप मंगसुळे , रमेश रावण ,फैसल पटेल ,आदी  ग्रामस्थ उपस्थित होते.

आयआयटी मुंबईकडून शरद इन्स्टिट्युटचा सन्मान

इमेज
  एनपीटीईएल कोर्समध्ये देश पातळीवर टॉप कॉलेजेसमध्ये समावेश यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :      यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एनपीटीईएल (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टक्नॉलॉजी इनहान्सड लर्निंग) मध्ये देशपातळीवर टॉप दोनशे मध्ये व राज्यात ११ वा क्रमांक मिळविळा आहे. याबद्दल आयआयटी मुंबई येथे आयआयटी चेन्नई एनपीटीईल हेड अॅन्ड्र्यु थंगरेज यांच्या हस्ते समन्वयक प्रा. जी. व्ही. पुजारी यांचा सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये प्रा. के.ए. कुपाडे यांनी फॅकल्टी डोमेन अॅडव्हान्सड कोर्स पूर्ण केला त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रा. के.ए. कुपाडे यांनी फॅकल्टी डोमेन अॅडव्हान्सड कोर्स पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयआयटी मुंबई एनपीटीईल प्रमुख डॉ. नंदीता महादेवन, प्रोजेक्ट मॅनेंजर भारती बालाजी उपस्थीत होते. NPTEL हे सात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी बॉम्बे, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास आणि रुरकी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) द्वारे अभ्यासक्रम सामग्री तयार करुन ते प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांन...

सैनिक टाकळी - खिद्रापूर रस्त्यावर महापुराचे पाणी ; वाहतूक ठप्प

इमेज
संजय चव्हाण / शिवार न्यूज नेटवर्क : सैनिक टाकळी- खिद्रापूर या मुख्य रस्त्यावर दोन फुटांवर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. राजापूरवाडी येथे पूरस्थिती गंभीर बनली असून तिन्ही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. आतापर्यंत खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी येथील सुमारे 300 कुटुंबातील 3 हजार लोकांनी जनावरांसह स्थलांतर केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.  सैनिक टाकळी कडून खिद्रापूर कडे जाणाऱ्या ओतावरील फुलाच्या दुतर्फा रस्त्यावर रात्री 1 फुटाणे पाण्यात वाढ झाली. यामुळे आज वाहतूक बंद झाली आहे. या ठिकाणी पाण्याचा वेग प्रचंड आहे. तरीही काहीजण पाण्यातून दुचाकी- चारचाकी नेत असल्याचे दिसून आले आहे.  खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी येथील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी केवळ सैनिक टाकळी येथील हा एकच मार्ग उपलब्ध होता. त्यातूनच नागरिकांची ये-जा चालू होती. मात्र या मार्गावर रात्री पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. 

हेरवाड ते पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :       गुरुवर्य विवेकानंद वास्कर फड यांच्या सहकार्याने व श्रावण वारी दिंडी सोहळा हेरवाड यांच्या संयोजनाने प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात हेरवाड ते श्री क्षेत्र पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी दि.९ ते १७ ऑगस्ट २०२४ अखेर सोहळ्याचे आयोजन केले आहे.   दिंडी सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी श्री.दिलीप बाळगोंडा पाटील (मफत),बाळासो परीट व विनोद माने यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.          दि. ९ ऑगस्ट२०२४ रोजी सकाळी ६ वाजता दिंडी प्रस्थान करेल तर दि.१७ ऑगस्ट२०२४ रोजी परतीचा प्रवास होईल.

चिकोडीच्या नूतन खासदार प्रियांकाताई जारकीहोळी यांनी केली निपाणी पूर परस्थितीची पाहणी

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  काळम्मावाडी धरण पाणलोट क्षेत्रात होणारा मुसळधार पावसामुळे निप्पानी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आणि पुर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चिकोडीच्या नूतन लोकप्रिय खासदार प्रियंकाताई सतिश जारकीहोळी यांनी निपाणी भागाचा पाहणी दौरा केला._यावेळी पुरग्रस्थ भागाची पाहणी करून लोकांच्या भावना जाणुन घेऊन त्यांना मानसिक धिर दिला.व आपण सदैव तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. कर्नाटक राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामय्या व बेळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री,आमचे पिताश्री नामदार सतिश आण्णा जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने तालुक्यांतील नुकसान पूरग्रस्त व शेतकरी यांना निधी प्राप्त करून देण्याचे अभिवचन प्रियांकाताई जारकीहोळी यांनी दिले.  यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील,चिकोडी जिल्हा काँगेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रतीक शहा, अमृत ढाले, अव...

शिरढोण मध्ये कृष्णा जलवाहिनीला लागली भली मोठी गळती

इमेज
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :     शिरढोण गावामध्ये कृष्णा पाईप लाईन योजनेला मायगोंडा ऐनापुरे यांच्या घरासमोर मोठे लिकेज झाल्यामुळे गावातील व माळावरील पाणी पुरवठा किमान तीन दिवस तरी बंद राहणार आहे. सर्वाांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे अशी विनंंती ण ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.      शिरढोण ग्रामपंचायतीच्या पाण्याची पाईप लाईन बस्तवाड रोड वर  दुरुस्ती सुरु असल्याने शिरढोणच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन महापुरात गंभीर बनला आहे. गेल्या महिन्यापासून सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी वारंवार भेटून नवीन पाईप लाईन करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार भेटून माहिती दिली होती. यावेळी नवीन पाईप लाईन बसवून देतो असे आश्वासन दिले होते परंतू अद्यापपर्यंत काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे ऐन महापुरात नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे.

शिरटी - शिरोळ मार्गावर पाणी : रात्रीपर्यंत वाहतूक बंद होण्याची शक्यता

इमेज
शिरटी / शिवार न्यूज नेटवर्क :            गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी राधानगरी व कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. आज ( रविवार ) सकाळी शिरटी - शिरोळ मार्गावर मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सध्या या पाण्यातूनच वाहतूक सुरू आहे. हे पाणी आणखी वाढल्यास महावीरनगर मार्गे कनवाड- शिरोळ रस्त्याने वाहतूक सुरू होईल. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांनी धीर धरला असला तरी धरणातील पाण्याचे विसर्गामुळे नागरिकांच्या मनामध्ये महापुराची धास्ती कायम आहे.

माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या कार्यकर्त्यांकडून पूरस्थितीची पाहणी

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : गेल्या आठ दिवसापासून काळम्मावाडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेला असून अंतर्गत येणाऱ्या सर्व नद्यांना महापूर आलेला असून अनेक मार्ग बंद झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर , माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व निपाणीच्या विद्यमान आमदार,माजी मंत्री सौ शशिकला जोले कार्यकर्ते व बिरेश्वर को ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक श्री अप्पासाहेब जोल्ले व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील व संचालक श्रीकांत बंने, संचालक शरद जंगठे व पदाधिकारी यांनी बोरगाव येथील दूधगंगा नदीवर आलेल्या महापुर परिस्थितीचा पाहणी दौरा केला. *. निपाणी सह परिसरातील सर्वांची जीवनदायी ठरलेली काळम्मावाडी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पावसाने दुधगंगा सह अनेक नद्यांनी रौद्ररूप धारण करून महापुराचे परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आण्णा वाहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली एकसंबा येथील बिरेश्र्वर क्रेडिट सोसायटी या मुख्य शाखेचे संचालक व निप्पानी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री अप्पासा...

गणेशवाडी - कागवाड रस्त्यावर पुराचे पाणी

इमेज
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी कागवाड दरम्यानच्या रस्त्यावर आज रविवारी दूपारी पुराचे पाणी आले. या रस्त्यावर दीड ते दोन फुट पाणी असुन सद्या पुराच्या पाण्यातुनच वाहतुक सुरु आहे. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी कृष्णेचे पाणी पातळीत अजुनही सतत वाढ होत आहे. यामुळे आज गणेशवाडी कागवाड रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. महाराष्ट्र -कर्नाटकला जोडणारा हा आंतरराज्य मार्ग आहे.या मार्गावर पुराचे पाणी आणखी वाढल्यास या रस्त्यावरील वाहतुक शेडशाळ मगदुम मळा कातरकट्टी रस्ता व्हाया कागवाड अशी होऊ शकते.

जि. प. प्राथमिक शाळेला कोण शिक्षक देता का शिक्षक

इमेज
सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क : गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागातील ऐतिहासिक निसर्गरम्य किल्ले सामानगडाच्या पायथ्याशी वसलेल्या नौकुड येथिल जि. प. प्राथमिक शाळेला कोण शिक्षक देता का शिक्षक म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून शिक्षकांवर चालणारी जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून हलकर्णी पूर्व भागातील अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौकुड गावातील मुलांची शाळा शिकायची की नाही अशी वेळ आली आहे. डोंगरी भाग असल्यामुळे शेतात पिकत नाही आणि पिकलेच तर जंगली प्राणी ती पिक ठेवत नाहीत या जंगली प्राण्यांसाठी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचे DFO साहेब यांना पत्राद्वारे माहिती दिली पण पर्याय काय निघाला नाही. त्यामुळे गावातील 50 ते 60 टक्के वर्ग मुंबई पुणे या ठिकाणी स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थी कमी आहेत म्हणून शिक्षक नाहीत आणि पालकांचे मत आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक नाहीत म्हणून विद्यार्थी नाहीत यामुळे पालक मुलांना शहरात शाळेसाठी पाठवत आहेत. नौकुड हे गाव तालुक्यापासून १५ किलो मीटर अंतारावर आहे. डोंगरी भागातील ग...

पंचगंगा नदी पूराचे पाणी माणकापुर फाट्यावर आल्याने नागरिकांत धाकधुक वाढली

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :        धरण पाणलोट क्षेत्रात होणारा मुसळधार पावसामुळे संपूर्ण जीवन विस्कळीत झाले आहे.पंचगंगा नदीच्या पूराचे पाणी माणकापूर फाट्यावर आल्याने मानकापूर वासियांची धाकधुक वाढली आहे.       पंचगंगा नदीच्या पाण्याचा फटका महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर आसलेल्या कर्नाटकातील माणकापूरला बसत आहे,दिवसेंदिवस पूर जन्य परिस्थिती निर्माण होत आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होवून माणकापूर गावच्या वेशीवर .पाटील मळा, रांगोळी फाटा येथे पाणी आले आहे .येथील पानपट्टी दुकाने व पीक अपशेड पाण्यात आहेत.त्यामुळे या मार्गावरील वहातुक बंद झाली आहे.तसेच रांगोळीचा संपर्क तुटला आहे. माणकापूरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असून पंचगंगा नदीच्या पूराच्या पाण्याचा फटका बसतो. गेल्या दोन वर्षांच्या महापूरातील कारखानदार यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच तलाठी यांनी पंचनामे केले पण ज्यांचे नुकसान झाले नाही अशा मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.त्यामुळे यंदा तरी पारदर्शक पीकांचे व पावसाने पडलेल्या घरांचे पंचनामे करावे अशी मागणी नागरिकांत...

इचलकरंजी येथील अपघातात शिरढोणचा इसम जागीच ठार

इमेज
  हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : खंजिरे इंडस्ट्रीज जवळ बिम्बाची गाडी भरून जात असताना टु व्हिलर व फोर व्हीलरच्या मध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले झाल्याची माहिती घटनास्थळावरून समजते. राजु ऐवाळे रा.शिरढोण असे मृत व्यक्तीचे नाव आहे.गंभीर जखमी व्यक्तीला आयजीएम मध्ये नेण्यात आले. घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल होऊन पंचनामा केले.राजु ऐवाळे हे कामावर जात असताना हा प्रकार घडला असल्याचे घटनास्थळावरून समजते.

कुरुंदवाड - नृसिंहवाडी आणि हेरवाड - तेरवाडचा संपर्क तुटला

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने कुरुंदवाड येथील शिवतीर्थ जवळ पाणी आल्याने कुरुंदवाड - नृसिंहवाडीचा संपर्क तुटला आहे. तर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास हेरवाड - तेरवाड मार्गावर पाणी आल्याने या मार्गांवरील वाहतुक बंद झाली आहे. शिरोळ तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे आणि धरण पाणलोट क्षेत्रातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुरुंदवाड - नृसिंहवाडीचा व हेरवाड - तेरवाड मार्ग पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गौरवाड - गडगले-जाधव मळा व्हाया - कवठेगुलंद रस्ता पाण्याखाली

इमेज
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला असला तरी कृष्णा - पंचगंगेच्या पातळीत सतत वाढ होतच आहे. आज शनिवारी सांयकाळी सात वाजता गौरवाड...गडगले..जाधव मळा व्हाया कवठेगुलंदला जोडणार्‍या रस्त्यावर पाणी आले आहे. गौरवाड- कवठेगुलंद रस्त्यावर पाणी आल्याने दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. तरीही सद्या या रस्त्यावरील पाण्यातुनच वाहतुक सुरु असली तरी पाणी पातळी याच गतीने वाढत राहील्यास रात्रीनतंर कधीही हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होईल. दरम्यान पुराचा धोका ओळखुन गडगले - जाधव मळ्यात वस्ती करुन असलेली कुटुंबे स्थंलातर केली आहेत. यामध्ये रावसाहेब गडगले,तानाजी नारे,प्रकाश नारे,रवी नारे,नितीन नारे,महावीर कोले,आदी कुटुंबे आपल्या प्रांपचिक साहित्य व जनावरांसह सुरक्षित ठिकाणी आपल्या पै-पाहुणे...नातेवाईक यांच्याकडे स्वतःहुन स्थंलातर झाली आहेत.

शिरढोण येथील पुराचे पाणी आल्यामुळे एकुण ४२ कुटुंब साहित्यासह स्थलांतर

इमेज
  हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क  शिरढोण येथील पुराचे पाणी घरात व घराभोवती आल्यामुळे नदीकाठी वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना व जनावरांना स्थलांतरित करण्यात आले.तर एकुण 42 कुटुंब साहित्यासह स्थलांतर झाले.त्यापैकी काही कुटुंब कन्या व कुमार शाळेत तर काही कुटुंब मित्र परिवार,पै-पाहुणे तसेच अन्य ठिकाणी असलेल्या स्वतःच्या घरात राहीले आहेत. पाणी पातळी हळूवार वाढत असल्याने अजून काही कुटुंबे स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत तसेच प्रशासनाने येथील गावभाग व माळभाग येथील जिल्हा परिषद शाळेत राहणे व जनावरे बांधण्याची सोय केली आहेत. प्रशासन मात्र पाण्याची वाट न बघता तत्काळ स्थलांतरित व्हा या भूमिकेत आहे. यासाठी सरपंच बाबासाहेब हेरवाडे उपसरपंच शक्ती पाटील सदस्य भास्कर कुंभार शशिकांत चौधरी आदीसह ग्रामपंचायत कर्मचारी काम करत आहेत. 

महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा: मुख्याधिकारी चौहान

इमेज
आम्ही प्रशासनासोबत कुरुंदवाडकरांचे आश्वासन कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :        महापुराचा सामना करण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था,बँका, मंडळे, प्रतिष्ठित नागरिक यांच्या लोकवर्गणीतून स्थलांतरित कुटुंबांच्या जीवनावश्यक वस्तूच्या गरजा पूर्ण करण्यात येणार आहेत. प्रशासनाकडूनही मदत पुरवठा केली जाणार आहे.स्थलांतरसाठी शहरातील सामाजिक मंडळांनी आणि नागरिकांनी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी केले.           कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शनिवारी सायंकाळी 4 वाजता बोलविण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला सपोनि रविराज फडणीस,एस टी डेपोचे व्यवस्थापक नामदेव पतंगे,आरोग्य अधिकारी रेखा तराळ, तलाठी प्रतीक्षा ढेरे,वीज वितरण कंपनीच्या संगीता पाटील पशु वैधकीय अधिकारी डॉ.प्रमोद झेंडे आदी प्रमुख उपस्थित होते.       याबैठकीत निवारा केंद्रे,चारा छावणी,स्थलांतरसाठीच्या वाहनांच्या सुविधा,पुरग्रस्तांच्या जेवणाची सोय व एकंदरीत सर्व महापुरावर प्रशासनाचे नियंत्रण ...

आलास - मंगावती जुगळ रोडवर पाणी ; कर्नाटकचा संपर्क तुटला

इमेज
  इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क : पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने शिरोळ तालुक्यातील आलास - मंगावती - जुगुळ मार्गावर पुराचे पाणी आल्याने कर्नाटकला जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान पाण्याच्या पातळीत वाढ सुरू असून आलास परिसरातील अनेक ग्रामस्थ स्थलांतरित होत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आज शनिवारी सकाळी कर्नाटक राज्याला जोडणारा आलास - मंगावती जुगळ मार्ग पाण्याखाली गेला आहे. 

मजरेवाडी-अकिवाट रस्त्यावर पाणी

इमेज
  मजरेवाडी...बाळुमामा मंदिरमार्गे व्हाया - अकिवाट हा पर्याय उपलब्ध अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील कृष्णा -पंचगंगेच्या पाणी पातळीत काल दिवसभरात संथ गतीने वाढ होत आहे. यामुळे आज पहाटे मजरेवाडी-अकिवाट रस्त्यावरील भोरे पेट्रोल पंपाजवळ पुराचे पाणी आले आहे. सद्या रस्त्यावर दीड ते दोन फुट पाणी आहे. तरीही पाण्यातुनच दुचाकी... चारचाकी वाहनाची वाहतुक सुरु आहे. दरम्यान मजरेवाडी ते बाळुमामा मंदिर मार्गे गुरुदत्त कारखान्यावरुन अकिवाट ला जाण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे.

बस्तवाडला पुराचा विळखा ; गावातील सत्तर टक्के लोक स्थंलातर

इमेज
अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा संगम घाटाजवळचे सर्वात पहिले गाव असणार्‍या बस्तवाडला पुराचा विळखा पडला आहे. आज सकाळी कुरुंदवाड - बस्तवाड मार्ग पाण्याखाली गेला आहे तर उद्या सकाळपर्यंत बस्तवाड - अकिवाट मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. याधर्तीवर गावातील एकुण लोकसंख्येच्या सत्तर टक्के लोक स्वतःहुन व प्रशासनाच्या सुचनेनूसार प्रांपचिक साहित्य व जनावरासह सुरक्षित ठिकाणी स्थंलातर केले आहेत. पुराचा सर्वात जास्त फटका शिरोळ तालुक्यातील बस्तवाडला बसतो. दरम्यान अकिवाट बस्तवाड रस्त्याला पाणी येऊन लागले आहे. पाण्याची पातळी याच गतीने वाढत राहील्यास बस्तवाडला बेटाचे स्वरुप येणार आहे. यामुळे आज या गावाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर , तहसिलदार अनिलकुमार हेळकर व गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी भेट देऊन पुरस्थितीची पाहणी केली व ग्रामस्थानी सतर्क राहुन सुरक्षित ठिकाणी स्थंलातर होण्याच्या सुचना केल्या. दरम्यान बस्तवाडचे सरपंच अम्माजान नुरपाशा पाटील,सर्व सदस्य,ग्रामसेवक महालिंग अकिवाटे,तलाठी अभिजीत पाटील,पोलीस पाटील सुखदेव कोळी,सामाजिक कार्यकर्ते जाफरभाई पटेल ...

हेरले गावात प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत

इमेज
संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क : वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख मा. बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा कोल्हापूर येथून सांगलीकडे रवाना होताना हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे वंचित बहुजन आघाडी, मुस्लिम व नाभिक समाजाच्या वतीने तसेच जेष्ठ नागरिक, बौद्ध समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.  ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे,ओबीसी मध्ये होणारी घुसखोरी थांबली पाहिजे आणि एस.सी, एस,टी घटकाला शासकीय नोकरीत पदोन्नती मिळाली पाहिजे हे सर्व मुद्दे घेऊन ही यात्रा मुंबई येथून निघाली आहे. याचा समारोप औरंगाबाद येथे होणार आहे या यात्रेला हातकणंगले तालुक्यातील सर्व ओबीसी घटकांचा,एस.सी,एस.टी घटकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला हातकणंगले येथे कॉर्नर सभा घेऊन ही यात्रा सांगलीकडे रवाना झाली.  या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले तालुकाध्यक्ष आशपाक देसाई उद्योजक सरदार आवळे ,माजी उपसरपंच बख्तियार जमादार,मुनीर जमादार, माजी सरपंच रियाज जमादार, सुरेश कदम, ज्येष्ठ नागरिक अशोक कदम, सुकुमार खाबडे, बबन शिंदे, नाभिक समाज व वंचित चे अध्यक्ष दादासो काशीद,मुस्लिम समाज माजी...

पूरग्रस्त, जनावरांसाठी तातडीने छावण्या सुरू करा : राकेश खोंद्रे

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर बनत आहे. प्रशासनाने तातडीने पुरग्रस्तांसह जनावरांसाठी छावण्या सुरू करून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू करण्याची मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांनी केली आहे. याबाबत शिरोळचे नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांची शुक्रवारी (ता.२५) भेट घेऊन त्यांनी पुरस्थितीची माहिती देऊन तातडीने गावागावात मदत कार्य सुरू मागणी केली.      श्री खोंद्रे म्हणाले, सध्या तालुक्यात नद्यांचे पाणी गावात येण्यास प्रारंभ झाला आहे. ज्या ठिकाणी धोका जास्त आहे त्या ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे आहे. जनावरे सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. नागरिकांनाही सुरक्षितस्थळी नेण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कार्यवाही सुरू करावी. अचानक पाणी वाढल्यास नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.      नागरिकांचे जेवण, औषध यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. स्थलांतर करण्यासाठी अनेक वाहनधारक नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात भाडे आकारतात यावरही प्रशासनाने आरटीओमार्फत अंकुश ठेवण्याची मागणी श्री खोंद्रे यांनी याव...

श्री दत्तच्या चेअरमनपदी रघुनाथ पाटील,व्हाईस चेअरमनपदी शरदचंद्र पाठक यांची एकमताने निवड

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :       येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रघुनाथ देवगोंडा पाटील (चंदुर) यांची तर व्हाईस चेअरमनपदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक (कुन्नूर) यांची एकमताने निवड झाली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले.  श्री दत्त साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली यावेळी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी चेअरमन पदासाठी रघुनाथ पाटील यांचे नाव सुचविले त्यास ज्येष्ठ संचालक अनिलकुमार यादव यांनी अनुमोदन दिले चेअरमन पदासाठी रघुनाथ पाटील यांचे एकमेव नाव पुढे आल्याने त्यांची एकमताने निवड झाली व्हाईस चेअरमन पदासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई या...

पुरग्रस्तांच्या प्राथमिक गरजांसह औषधसाठा सज्ज ठेवावा : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  सध्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुरप्रवण क्षेत्रातील काही नागरीक सुरक्षित स्थळी तसेच निवारा शेडमध्ये स्थलांतरीत होत आहेत. त्यांच्यासाठी राहण्याचे नियोजन करुन पाणी, जेवण यासह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. खाजगी कॉलेज आणि परिवहन महामंडळाने दळणवळणासाठी आपली वाहने ज्यादा इंधनासहित सज्ज ठेवावीत. स्थलांतरित जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन स्थानिक प्रशासनाने करुन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुकाक्यातील प्रशासनाला केल्या. शिरोळ तहसिल कार्यालय येथे महापुरासंदर्भात आयोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसिलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, नायब तहसिलदार योगेश जमदाडे, आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांच्यासह तालुक्यातील प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी सूचना देताना आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यातील पूरप्रवण क्षेत्रातील नागरिक स्थलांतरीत होत आहेत. त्यांच्या राहण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची व्यवस्...

शिरढोण येथे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भिंती कोसळल्या...

इमेज
  हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले धरणाचे पाच दरवाजे उघडले असून अजूनही पावसाचा जोर असल्यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.तसेच रातभर मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपूर्वी गावभागात नारायण आडसुळे यांची तर माळभागावरील महादेव कोरे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली आहे यांची पाहणी करत असताना ग्रामपंचायत उपसरपंच शक्ती पाटील,ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुंभार व अरिहंत कापसे आणि ग्रामस्थ होते व पंचनामा करण्यासाठी तलाठी रवी कांबळे यांनी घटनास्थळी होते.

हेरवाड - घोसरवाडचा संपर्क तुटला

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरण क्षेत्रातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे हेरवाड - घोसरवाड मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. हेरवाड मध्ये सुतार वस्तीत काल महापुराचे पाणी आल्याने तेथील नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. त्याचबरोबर येथील कन्याशाळे मागे असणाऱ्या इटाज गल्ली, बंडगर गल्ली आदी ठिकाणचे नागरिक पुराचा धोका ओळखून स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत.

सदलगा - बोरगाव रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  शेतकऱ्यांची जीवनदायी असलेल्या दुधगंगा तथा काळमवाडी धरण पाणलोट क्षेत्रात सतत मुसळधार पावसाने थैमान घातले असून काळमवाडी धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे त्या कारण काल धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे काल धरणातून दोन दरवाजे उघडले असून दूध गंगा नद्यांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन संबंधित गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे.           काल कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यात सतत धार अतिवृष्टीमुळे नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बोरगाव सदलगा मार्ग पूर्ण बंद झालेले आहे, बोरगाव सदलगा दरम्यान असलेल्या बंधाऱ्यावर रात्री पाणी आल्याने पूर्णपणे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बोरगांव येथील लक्ष्मी येथे पाणी आल्याने जनवाड मार्गे वाहतूक चालू होती मात्र कालच्या अतिृष्टीमुळे नद्यांचा पाणी पात्रात वाढ होऊन बोरगांव सदलगा बंधाऱ्यावर पाणी आले आहे. सदलगा पोलीस स्टेशन व एन डी आर एफ टीम आणि प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे...

दानोळी - कवठेसार मार्गावर पुराचे पाणी ; मार्ग वाहतुकीसाठी बंद

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने दानोळी कवठेसारचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कवठेसारमधील अनेक ग्रामस्थ आपल्या जनावरांसह इतर ठिकाणी स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत.  शिरोळ तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे आणि धरण पाणलोट क्षेत्रातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. काल गुरुवारी दानोळी - कोथळी हा मार्ग पाण्याखाली गेला होता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने दानोळी - कवठेसार हा मार्गही आज पहाटेच्या वेळी पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुरुंदवाड - बस्तवाडचा संपर्क तुटला..!

इमेज
  अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : पावसाचा जोर व धरणातुन सोडण्यात आलेले पाणी यामुळे कृष्णा पंचगंगेच्या पातळीत सतत वाढ होत आहे.  यामुळे आज पहाटे कुरुंदवाड -बस्तवाड मार्गावर पाणी आले आहे.यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे - तलाठी रवी कांबळे

इमेज
  हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले धरणाचे पाच दरवाजे उघडले असून अजूनही पावसाचा जोर असल्यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. शिरढोण परिसरातील व नदीकाठच्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.अशा सुचना देताना तलाठी रवी कांबळे या ठिकाणी जाऊन नागरिकांना सांगितले.

महाराष्ट्रला सावरण्यासाठी आणखीन निधी द्यावा : खासदार धैर्यशील माने

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यात पुराची परिस्थिती येते आहे.या महापूरातून महाराष्ट्रला सावरण्यासाठी जागतिक बँकेकडून देण्यात आलेल्या पॅकेज बरोबरच केंद्र शासनाने ही आणखीन निधी द्यावा अशी मागणी हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज संसदेच्या अधिवेशनात केली.       गेल्या चार पाच दिवसां पासून चाललेल्या केंद्रीय बजेट अधिवेशनामध्ये आज खासदार धैर्यशील माने यांनां बोलण्याची संधी मिळाली.या मद्ये बोलताना त्यांनी सांगली - कोल्हापूर जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्राला पुराचा धोका निर्माण झाल्याचे सांगितले.या तून सावरण्यासाठी विविध उपयोजना करणे गरजेच्या आहेत.त्या साठी जागतिक बँकेने तीन हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले असल्याचे सांगत केंद्रानेही आणखीन निधी द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीने पूरबाधित क्षेत्राचे संरक्षण होणार आहे.         बोलताना त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघतील विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत झालेला उद्रेक सांगत महाराष्ट्रतील गड किल्ले हॆ महाराष्ट्राचे सौंदर्य,महाराष्ट्राचे भूषण आहेत. छत्रपती शिवाजी...

उदगावात पाणी आल्याने सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग बंद

इमेज
  उदगांव / शिवार न्यूज नेटवर्क : सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील टोल नाक्याजवळील कृष्णा नदीच्या पुराचे पाणी आल्याने गुरुवारी रात्री आठच्या सुमारास बायपास महामार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे सांगली कोल्हापूर महामार्गावरील सर्व वाहतूक उदगाव-जयसिंगपूर मधून वळविण्यात आली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी, कृष्णा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गुरुवारी रात्री उदगाव येथील टोल नाक्याजवळ बायपास महामार्गावर असलेल्या ओढयाला कृष्णा नदीचे पाणी आल्याने जयसिंगपूर पोलीस गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास बायपास महामार्ग बॅरिगेट लावून बंद केला. तर तमदलगे बाजूने बायपास महामार्गावर रेल्वे स्टेशन जवळ हे डायरेक्ट लावण्यात आले. त्यामुळे सांगली कोल्हापूर महामार्गावरील सर्व वाहतूक उदगाव जयसिंगपूर मार्गे वळविण्यात आली आहे. सन 2021 रोजी आलेल्या महापुरापूर्वी 23 जुलै रोजी ओढ्यावर पाणी येऊन बायपास महामार्ग बंद झाला होता.

दत्त कारखान्याच्या नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचा निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यामुळे , कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी करता शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे सेक्रेटरी अशोक शिंदे यांनी दिली.  श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यावरती उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या सत्ताधारी पॅनेलने सर्व 21 जागा जिंकल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी उशिरा केंद्रीय सहकार खात्याच्या प्राधिकरणाने नूतन संचालकांच्या नावांना वैधता दिली आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी विजयी उमेदवारांची यादी कारखाना कार्यस्थळावरती प्रसिद्ध केली आहे. जिल्हाधिकारी यांनी निवडणूक प्रवीण निवडणुकीपूर्वी स्थगित केलेली विशेष सभा पूर्ण करण्याकरता तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी करता नूतन संचालकांची विशेष बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी 11 वाजता बोलवण्यात आली असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.  दरम्यान कारखान्याच्या अध्यक्षपदी गणपतराव पाटील यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता असून उपाध्यक्षपदी कोणाला संधी म...

धोका वाढला ; शिरोळ तालुक्यात स्थलांतर सुरूच

इमेज
  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून सतर्क राहण्याच्या सूचना   शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  धरण क्षेत्रात सहज शिरोळ तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत जलद गतीने वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातूनही स्वयंचलित चार दरवाज्याच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शिरोळ तालुक्याला धोका वाढला आहे. बुधवारपासून शिरोळ तालुक्यातील नदीकाठावर असणाऱ्या ग्रामस्थांसह जनावरांचे स्थलांतर सुरू असून आज गुरुवारी दिवसभरात संभाव्य पूरस्थितीचा धोका ओळखून अनेक नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले आहेत.  सध्या शिरोळ तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते पुराच्या पाण्यामुळे ब्लॉक झाले आहेत गुरुवारी दिवसभरात कुरुंदवाड - नांदणी हा पूल तर दूधगंगा नदीवरील दानवाड - एकसंबा हा मोठा पूल पाण्याखाली गेला आहे. तर टाकवडे - इचलकरंजी हा प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.  तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील भैरववाडी गोठणपुर भागातील अनेक नागरिक स्थलांतरित होत आहेत. तर अकिवाट, टाकळी व राजापूर या गावातील नदीक...

पुणे न्यूज एक्स्प्रेस तर्फे सौ. महाबुब उस्मान मुजावर यांना आदर्श समाज सेविका पुरस्कार जाहीर

इमेज
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : शिरढोण गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील सौ. महाबुब उस्मान मुजावर यांना पुणे न्यूज एक्स्प्रेस तर्फे आदर्श समाज सेविका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.महाबुब मुजावर यांनी अनेकांची मदत केली आहेत.त्यांनी काही वर्षांपुर्वी शिरढोण येथे अवकाळी मुसळधार पावसामुळे शिरढोण परिसरातील अनेक ऊसतोड मजुरांचा संसार अक्षरशः पाण्यात बुडाला होता.त्यामुळे पावसात भिजत थंडीत कुडकुडत ऊसतोड मजुरांनी आपल्या लहान मुलाबाळांसह रात्र जागुन काढली.त्यावेळी केवळ हळहळ व्यक्त न करता शिरढोण येथील सर्वसामान्य कुटुंबातील महाबुब उस्मान मुजावर यांच्या कुटुंबीयांसमवेत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांना एक घास संवेदनेचा या प्रमाणे गावातील सर्वच ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांना एक वेळेस जेवण देऊन त्यांचे पावसात भिजलेली साहित्य स्थलांतरित करण्यास मदत करत सामाजिक बांधिलकी जपली.२०१९ मध्ये कोरोना सारख्या काळात देखील अनेकांना मदत केली.२०२१ मध्ये महापुराच्या पाण्यामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली होतीत पण या वेळी देखील एक पाऊल पुढे टाकत आपले कार्य करीत सामाजिक बांधिलकी जपली.यांच्या या कार्याची दखल घेत या...

राज्यस्तरीय लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाजगौरव पुरस्कार संपादक रविराज ऐवळे यांना जाहीर

इमेज
  १ ऑगस्ट ला पत्रकार भवन पुणे येथे होणार वितरण  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :            कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक अप्रतिम या वर्तमानपत्राचे संपादक रविराज कृष्णा ऐवळे यांना यंदाचा राज्यस्तरीय लोकशाहीर आण्णा भाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकशाहीर आण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्त या पुरस्काराचे 1 ऑगस्ट 2024 रोजी पत्रकार भवन पुणे येथे देशाच्या 1971 च्या युद्धामध्ये सेवा बजावलेले निवृत्त कर्नल मा.श्री सुरेश पाटील, पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक मा.श्री फिरोज मुल्ला सर, व मा. श्री. संतोष आठवले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.                दैनिक अप्रतिम च्या माध्यमातून श्री रविराज ऐवळे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील पँथर आर्मी स्वराज्य क्रांतीसंघटना यांच्या वतिने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार विविध मान्यवरांना जाहीर झाला असून कोल्हापूर जिल्ह्यातून रविराज ऐवळे यांना जाहीर झा...

बेळगांव जिल्ह्यातील शाळांना २५ व २६ रोजी सुट्टी जाहीर

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :               बेळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून बेळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे अवघड होणार असल्याची दखल घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विद्यार्थ्यांना उद्या गुरुवार दिनांक 25 जुलै आणि शुक्रवार दि. 26 रोजी दोन दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, बैलहोंगल, खानापूर, कित्तूर, चिक्कोडी, निप्पाणी तालुक्यातील शाळांना २५ जुलै आणि २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यांचा समावेश आहे. संबंधित आदेश सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांना लागू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. एकंदर गेल्या आठवड्या पासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे,शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आले आहे.       

चिंचवाड येथे घराची पडझड, शेडचे नुकसान ; अतिवृष्टीचा ग्रामस्थांना फटका

इमेज
उदगाव / शिवार न्यूज नेटवर्क :  चिंचवाड (ता. शिरोळ ) येथे संततधार सुरू असलेल्या पावसामुळे घराची पडझड झाली असून भिंत कोसळून शेजारील पंक्चर दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित आली आणि झाली नाही.  येथील पार्वती धोंडीराम नाईक यांच्या घराचे रात्री बाराच्या सुमारास भिंत कोसळली. ही भिंत शेजारी असलेल्या मोहन शामराव गोधडे यांच्या पंक्चर दुकानाच्या शेडवर पडल्याने मोठा आवाज झाला. आवाज ऐकून नागरिकांनी गर्दी केली होती. पडलेल्या खोलीच्या शेजारील खोलीतच पार्वती नाईक यांचा मुलगा मारुती नाईक व त्यांच्या पत्नी झोपल्या होत्या मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाकडून लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नाईक व गोधळे कुटुंबियातून होत आहे नाईक व गोधडे कुटुंबातून होत आहे.

महापुर आल्यास संबंधित ग्रामस्थांनी सुरक्षा स्थळी स्थलांतरित व्हावे : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :       बेळगाव सह कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होणारा सततधार पाऊस, या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असून बेळगाव जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 427 या काळजी केंद्रांना भेट देऊन तयारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे याबाबत प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.     आज सकाळपासून अलमट्टी जलाशयातील पाण्याचा विसर्ग किमान दोन लाख क्विसेस पर्यंत वाढविण्यात आला असून बेळगाव जिल्ह्या बरोबरच महाराष्ट्रातून येणाऱ्या नदीच्या पाण्यासंदर्भात 24 तास लक्ष ठेवले जात आहे अशी माहिती बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. - गेले आठ दिवसापासून कोकण व कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा मुसळधार पाऊस सतत कोसळत आहे , संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर पुढे बोलताना जिल्ह...